Posts

Showing posts from October, 2017

शेतमालाची ‘महागाई’ नाहीच! सतीश देशमुख

अन्नधान्यांचे, दूध, फळे/ भाजीपाल्यांचे भाव थोडे वाढले की शहरांमध्ये ‘महागाई’ वाढल्याची ओरड सुरू होते. शेतमालाचा उत्पादन खर्च गृहीत धरल्यास ‘महागाई’ची परिभाषाच इथे लागू पडत नाही. घाऊक किंमत निर्देशांक वाढ दर गेल्या बारा वर्षांत अनेक प्रकारच्या मालासाठी ‘उणे’च राहिला आहे. आधारभूत किमतीही वाढलेल्या नाहीत. तरीही शहरांमध्ये भाज्या, साखर आदी महागले की बोंब ठरलेलीच. असे होण्यामागील कारणांचा मागोवा घेतल्यास सरकारची धोरणे कशी कृषीकेंद्री नाहीत हेच लक्षात येते.. अन्नधान्यांचे, दूध, फळे/ भाजीपाल्यांचे भाव थोडे वाढले की शहरांमध्ये ‘महागाई’ वाढल्याची ओरड सुरू होते. शहरी मध्यमवर्गीयांची ही मानसिकता बदलण्याचे फार मोठे आव्हान आहे. वर्तमानपत्रे/ मीडियावाले हे शेतमाल, साखर, दूध, डाळ किंवा मेथी/ कोथिंबिरीची जुडी ‘महागली’ अशी शीर्षके देतात. ‘कांदा सफरचंदापेक्षा महाग’ किंवा ‘बँकेत कर्ज काढायला चाललो आहे, कारण कांदे खरेदी करायचे आहेत’ अशा अर्थाची व्यंगचित्रे काढली जातात. येथे शेतकऱ्यांचा जीव जातो आहे आणि तुम्हाला विनोद सुचतो? तुमची महागाईची परिभाषा आहे तरी काय? गेल्या काही वर्षांत ‘इतर’ वस्तूंचे भाव कि

.. तरीही ती ‘साजरी’च-मंदार भारदे

. . तरीही ती ‘साजरी’च-मंदार भारदे  माझ्या लहानपणीच्या सगळ्या दिवाळी मी शेवगाव आणि पाथर्डी या माझ्या दोन्हीकडच्या आजी-आजोबांच्या गावांत साजऱ्या केल्या आहेत. मराठवाडय़ाच्या सीमेवर असलेले हे जवळजवळ बारमाही दुष्काळी तालुके. इथे ना नदी आहे, ना हिरवे हिरवे डोंगर. लांबच लांब मोठय़ा डौलाने वाऱ्यावर डोलणारी पिके आणि झुळझुळ वाहणारे पाणी वगैरे असले तिथे दोन्हीकडे काहीही नाही. पण मला मात्र ही दोन्ही गावे भरभराटीची आणि सदा बहरलेलीच वाटत आलीयेत. जगातल्या काही सर्वोत्कृष्ट शहरांत राहण्याची संधी मला अनेकदा मिळाली. ही सगळीच गावे प्रगत होती, पैशाची आणि सुखसुविधांची लयलूट या सगळ्याच शहरांत होती. पण ही गावे माझ्या मनावर तो बहर त्या गावांवर असल्याचा प्रभाव पाडू शकली नाहीत, जो बहर मला शेवगाव आणि पाथर्डीत जाणवतो. माझे हे विधान अनेकांना अतिशयोक्त वाटेल. कदाचित या दोन्ही गावांत राहणाऱ्यांनाही या बाबतीत काही वेगळे म्हणायचे असेल. त्या सगळ्यांनी एकदा माझ्या चष्म्यातून ही गावे पाहावीत. तुम्हाला कळायला लागले तेव्हा तुमची पहिली दिवाळी या गावात गेलीये. तुमचे आजी-आजोबा, भावंडं, सगळे नातलग कुठूनकुठून तिथे आलेत. आणि