Posts

Showing posts from February, 2015

#मराठी राजभाषा दिन

मराठी राजभाषा दिनानिमित्त तमाम मराठीजनांना मनापासून शुभेच्छा. ज्यांचा जन्मदिन आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो, त्या कुसुमाग्रजांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन! खरे तर आपल्या मातृभाषेसाठी असा एक दिवस "राजभाषा/गौरव दिन " या गोंडस नावाखाली साजरा करण्यात आपण  धन्यता मानण्यापेक्षा दैनंदिन जीवनात आपण फक्त जाणीवपूर्वक काही छोट्या छोट्या गोष्टी केल्यास विनासायास आजीवन "मराठी गौरव दिन " साजरा होतच राहील याची खात्री मनात बाळगा काही छोट्या-छोट्या गोष्टी आपण केल्या, तरी भाषेच्या विकासाला त्या पूरक ठरतील.दररोज आपण भरपूर इंग्लिश/हिंदी शब्द आपल्या व्यवहारात  कळत नकळत वापरत असतो त्यांचे पर्यायी शब्द माहिती करून घेण्याचा  प्रयत्न करूयात .  आज आपण माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे समाज माध्यमांत (सोशल मीडिया) अगदी सहजपणे मराठी वापरू शकतो जसे की युनिकोड-मराठी. त्याचा वापर वाढवा, युनिकोड मराठी पद्धतीचा प्रसार करा,  महत्वाचे म्हणजे वेळोवेळी आपला परभाषिक व्यक्तींशी जसे कि प्रवासातील संभाषणात (आपल्या शहरात जे महाराष्टात असेल) किंवा कॉलसेंटर्स (माहिती केंद्रे) वरून येणाऱ्या दूर

भ्या, पण घाबरू नका-डॉ. राजीव शारंगपाणी

...... आजचा काळ   हा घबराट उत्पन्न करून आपल्या पोळीवर तूप ओढणाऱ्यांचा आहे. पुढे काही तरी भयंकर होऊ शकेल म्हणून आताच पैसे खर्च करा, असे सांगून तुमचे मदाऱ्याचे माकड करणाऱ्यांचा काळ आहे. आपण जर घाबरलो तर आपल्या अंगावरचे कपडेदेखील ओढून न्यायला कमी करणार नाहीत. 'भित्यापाठी ब्रह्मराक्षस' ही म्हण 'घाबरलेल्यापाठी ब्रह्मराक्षस' अशी थोडी बदलायची एवढेच. आयुष्य जगताना माणसापाठी अनेक प्रकारचे भय असते. साधा रस्ता ओलांडतानादेखील वाहने ज्या पद्धतीने अंगावर येतात, त्याचे भय असतेच प्रत्येकाला. पण आपण न घाबरता रस्ता ओलांडतो. सामान्यपणे काही होत नाही. भीतीला सामोरे जाऊन आपल्याला पाहिजे ते नीट करणे हे अतिशय महत्त्वाचे ठरते. मूर्तिमंत भीती समोर उभी असताना धैर्याने प्रसंगातून सहीसलामत बाहेर पडणे हे नंतर खूपच मनोरंजक वाटते. सामान्य आयुष्यात भीती दाखवून काळजी घेण्याचा आव आणणारे अनेक असतात. कित्येक लोकांच्या घरातच अशा व्यक्ती असतात की, कोणतीही एक नवी कल्पना मांडली की त्याच्यामुळे संपूर्ण नुकसान कसे होणार आहे हेच ते सांगू लागतात. ब्रह्मज्ञानी माणूसदेखील इतके छातीठोक बोलत नाही. ज्या माणसाने ही क