राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज यांना १०७व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
ग्रामगीताकार राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज यांना १०७व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन महाराजांचा "ग्रामगीता" हा अत्यंत सुबोध आणि रसाळ भाषेत लिहिलेला मराठीमधील अमोल ठेवा असलेला ग्रंथ ज्यात महाराजांनी मांडलेले विचार आजच्या काळात आचरणात आणण्याची नितांत आवश्यकता आहे. आजच्या कुठल्याही प्रसार माध्यमात त्यांच्या जयंतीचा किंवा त्यांनी ज्यासाठी जीवन समर्पित केले त्या विचारांचा कुठेही उल्लेख नाही यापेक्षा मन खिन्न करणारी गोष्ट ती अजून काय असेल ? असो आजच्या चटपटीत Breaking News च्या काळात याचे बातमी मुल्य शून्यच असेल बहुधा पण त्यामुळे नुकसान ते आपलेच , तेव्हा वेळ मिळेल तसा ग्रामगीता वाचूया आणि त्यामधील विचारांचे शक्य होईल तेवढे पालन करूया. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ग्रामगीतेतील अडतिसाव्या "ग्राम कुटुंब "अध्यायातील काही श्लोकरूपी सारांश जो नक्कीच आजच्या दुष्काळी परिस्थितीत मार्गदर्शक ठरू शकतो : ll जय गुरुदेव ll ________________________________________________________________________