Posts

Showing posts from September, 2015

सांस्कृतिक राजधानीचं गौडबंगाल(‘साप्ताहिक सकाळ’ दिवाळी अंक-२००६

‘गेल्या दोनशे वर्षात भारतात दोनच शहरात नव्या विचारांना उजाळा मिळत राहिला. एक कोलकाता आणि दुसरं पुणं, ‘ असे उद्गार ख्यातनाम नि चिंतनशील कवी-गीतकार जावेद अख्तर यांनी ‘साप्ताहिक सकाळ’च्या वर्धापनादिनी बोलताना काढले, तेव्हा सभागृहात संमतीच्या टाळ्यांचा गजर झाला. पुणं हे सांस्कृतिक-सामाजिकदृष्ट्या देशातलं अग्रेसर शहर असल्याचा पुणेकरांचा जुना दावा असल्यामुळे पुण्याबाहेरील कुणी असे गौरवोद्गार काढले, की पुणेकरांच्या मनाला गुदगुल्या होतात. पुणं हे आपल्याकडचं थोर शहर आहे, असा समज इतरत्रही पसरलेला आपल्याला दिसतो. गेली अनेक वर्षं महाराष्ट्रात कोणत्या ना कोणत्या कारणाने पुणं असं चर्चेत राहिलेलं आहे. या चर्चांमधून ओघाओघाने सर्वमान्य झालेला एक सिद्धांत म्हणजे ‘पुणं ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे.’ हे विधान सर्वप्रथम कोणी केलं आणि त्याला पहिली अनुमती कोणी दिली, हे कळायला मार्ग नसला तरी गेल्या पंधरा-वीस वर्षांत पुण्यात आमूलाग्र बदल झाला आहे, त्यामुळे हे विधान तपासण्याची वेळ मात्र आली आहे. आपल्या जुन्या ओळखीतला, रोजच्या बैठकीतला एखादा माणूस आपल्या डोळ्यांपुढे अनोळखी बनावा तसं काहीसं सध्याच्

तोचि धर्म ओळखावा-डॉ. अनघा लवळेकर

‘धर्म’ आणि ‘धार्मिकता’ या गोष्टीची अशी काय खासियत आहे, की ज्यामुळे लोकांना त्याचे आयुष्यात असणे इतके गरजेचे वाटते? ते म्हणजे फक्त काही नियम/जपजाप्य प्रार्थना आणि कर्मकाण्डच आहे का? बहुसंख्य लोक जरी धर्माचरण म्हणून हे करत असले तरी जेव्हा खोलात जाऊन संशोधकांनी अभ्यासले तेव्हा दिसले, की धर्म त्यांच्या दृष्टीने अशा काही धारणांचा, श्रद्धांचा विषय असतो की ज्यामुळे जगण्यातील काही सनातन प्रश्नांना उत्तरे मिळतात, असे त्यांना वाटत असते. आजोबा आता थकले होते. ऐंशी वर्षे उलटून गेली होती. तसे ते पूर्णपणे निरीश्वरवादी. थिऑसॉफिस्ट सोसायटीचे तरुणपणापासून सदस्य. विश्वरचनेचे प्रतीक असलेला ‘तारा’फक्त भिंतीवर लटकलेला असायचा. कधी देवपूजा केली नाही की कधी कुठले धर्माशी संबधित पूजाअर्चाचे सोपस्कार पाळले नाहीत. पण गेल्या काही दिवसांत त्यांनी नातीकडे आग्रह धरला होता की मला ‘दासबोध’ आणून दे. काल तर म्हणाले की मला ‘रामायण, महाभारताचे मूळ खंड ऐकायचेत. त्यातील ईश्वरी तत्त्व समजून घ्यायचय!’ नातीला कळेच ना की लहानपणापासून देवपूजा-पुराण, कर्मकाण्ड यांना उडवून लावणारे आजोबा खरे, की हे दासबोध, रामायण, महाभारत ऐका

सवय : एक कम्फर्ट झोन - नीलिमा किराणे

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. एक माणूस घोडीवरून भरधाव जात असतो. त्याची ऐट आणि घाई पाहून एकजण कुतूहलानं ओरडून विचारतो, "एवढ्या घाईनं कुठे चाललात शिलेदार?‘ घोडेस्वार म्हणतो, "माहीत नाही. घोडीला माहितीय, तिलाच विचारा.‘ या गोष्टीला शतकं लोटली. अजूनही आपापल्या "सवय‘ नावाच्या घोडीवर आपण स्वार होतो, तेव्हा, हळूहळू चालणारी, हातातली वाटणारी सवय भरधाव दौडू लागते. तिला आपोआप दौडताना पाहून आपण खुशीत येतो. नंतर कधीतरी कळतं, हातातला लगाम कधीच ढिला पडलाय, स्वार आपण असलो, तरी आता सवय आपल्याला दामटवत नेतेय, आपण अडकलोय. सवय हा बहुआयामी असा अदृश्‍य बॅरीअर आहे. सुरवातीला जाणवतही नाही, इतका हलका आणि नंतर तोडता येत नाही एवढा पक्का. सवयी जन्मजात नसतात. एखादी गोष्ट करण्याची गरज असते. ती केल्यामुळे बरं वाटतं, म्हणून ती पुन्हापुन्हा केली जाते आणि सवय पक्की होते. स्वयंपाक, मुलं-बाळं, दुखलं-खुपलं ही कामं स्त्रियांची, तर शिकार करणं, बाहेरच्या कटकटींपासून रक्षण करणं ही पुरुषांची अशा श्रमविभागणीची पूर्वी गरज होती. पिढ्यानपिढ्यांच्या सवयीतून आपापल्या कामांत कौशल्य येत गेलं, तशी आपल्या बाईपणा किवा पुरुषपण

एका सामान्य चहा विक्रेत्याचा असामान्य साहित्यिक प्रवास

एका सामान्य चहा विक्रेत्याचा असामान्य  साहित्यिक प्रवास Youtube : https://www.youtube.com/watch?v=fVN4cIn8clM bbc: http://www.bbc.com/news/world-asia-india-33532665