Posts

Showing posts from April, 2010

मॅनेजमेंट महागुरू!

‘मॅनेजमेंट’ ही कला आहे की शास्त्र? गेल्या तीन दशकांत आणि विशेषत: जागतिकीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू झाल्यानंतर ‘मॅनेजमेंट’ नावाच्या ज्ञानशाखेला अतोनात महत्त्व प्राप्त झाले. गेल्या १० वर्षांत ‘व्यवस्थापन’ हा विषय शिकविणाऱ्या मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट्सचे तर एक पेवच फुटले. भारतातील काही शिक्षणसम्राटांनी ‘एमबीए’ पदव्या देणारी, भलीमोठी फी आकारणारी एक जंगी फॅक्टरीच सुरू केली. उद्योग आणि व्यापार कमी असूनही त्यांचे व्यवस्थापन शिकलेले पदवीधर समाजात दिमाखात फिरू लागले. भले भले सॉफ्टवेअर इंजिनीअर्स, आर्किटेक्ट्स आणि मेडिकल डॉक्टर्सही ‘एमबीए’ होऊ लागले. ‘एमबीए’ शिक्षित इंजिनीअर आणि तोही अमेरिकेतील पदवीधर असेल तर तो स्वत:ला ‘सुपरब्राह्मण’ समजू लागला. भांडवलदारांना भांडवलशाही आणि व्यापाऱ्यांना धंदा करण्याची कला शिकविणारे हे ‘सुपरब्राह्मण’ हवेतच चालू लागले. पण त्यांना जमिनीवर उतरविणारा, जगातील गरिबीचे, विषमतेचे, अन्यायाचे, उपेक्षेचे भान देणारा ‘मॅनेजमेंट गुरू’ म्हणजे शनिवारी निधन पावलेले सी. के. प्रल्हाद! कोईमतूर कृष्णराव प्रल्हाद म्हणजे सी. के. प्रल्हाद. प्रल्हाद यांच्या नावातील पहिले आद्याक्षर ‘सी’

भाववाढीचे राजकीय अर्थशास्त्र

जीवनोपयोगी वस्तूंची आणि खास करून खाद्यान्नाची भाववाढ अर्निबध पद्धतीने सुरू राहाते, तेव्हा त्याची आंच समाजातील सर्वच घटकांना जाणवते. अगदी अंबानी बंधूंसारखे अब्जाधीशही या भाववाढीमुळे कामगारांच्या वेतनात वाढ होऊन परिणामी आपला नफ्याचा दर घटेल, या भीतीने थोडेफार सचिंत होत असतील. स्थिर उत्पन्न असणारी गोरगरीब प्रजेला किमान नजीकच्या काळात तरी वाढती उपासमार सहन करण्यावाचून दुसरा पर्याय उपलब्ध नसतो. अशी भाववाढ करण्यामागे कोणत्या शक्ती कार्यरत आहेत, याचे ज्ञान या महागाईच्या खाईत होरपळून निघणाऱ्या माणसाला नसते. अगदी विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी परीक्षा पास झालेल्या उच्चशिक्षित माणसालाही अभ्यासक्रमाद्वारे मिळणारे ज्ञान मर्यादित असते. तो वस्तूंचे भाव मागणी आणि पुरवठा यांच्या संतुलनाद्वारे निश्चित होतात, असे शिकलेला असतो. पण ते पूर्ण सत्य नव्हे. कारण बाजारपेठेतील पुरवठा कमी वा जास्त करून वस्तूंच्या ‘नैसर्गिक’ किमतीत फेरफार करण्याची कुवत वस्तूंचे उत्पादक वा वितरक यांच्यामध्ये असते. ज्या वस्तूंचे भाव वाढतात त्या वस्तूंचे उत्पादक वा वितरक यांचा भाववाढीमुळे आर्थिक लाभ होतो हे उघडच आहे. तसेच या

बजेटची गोष्ट

फेब्रुवारी महिन्यातील सर्वात महत्त्वाचा इव्हेंट म्हणजे बजेट अर्थात अर्थसंकल्प. अर्थसंकल्प हा सरकारचा वार्षिक उपक्रम असून गरीब, श्रीमंत सारेच त्याच्या प्रतीक्षेत असतात. अर्थसंकल्प किवा बजेट हा शब्द मध्ययुगीन काळातील इंग्लिशमधील बॉगेट (bowgette) या शब्दाचे सुधारित रूप आहे. हा शब्दही मध्यकाळातील फ्रेंच भाषेतील (bougette) या शब्दापासून आला आहे. या शब्दाचा मूळ अर्थ चामड्याची बॅग असा होतो. अलीकडच्या काळात अर्थसंकल्प फेब्रुवारीत सादर करण्यास सुरुवात झाली. मात्र, बजेटचा थोडा मागे जाऊन इतिहास रंजक आहे. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला तो २६ नोव्हेंबर १९४७ रोजी. तत्कालीन पहिले अर्थमंत्री सर आर.के. षण्मुगम चेट्टी यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. १९४४ च्या 'बॉम्बे प्लॅन'च्या धर्तीवर हा अर्थसंकल्प तयार करण्यात आलाहोता. जॉन मथाई, जी.डी.बिर्ला आणि जे.आर.डी. टाटा यांनी एकत्रितरीत्या तो तयार केला होता. या पहिल्याच अर्थसंकल्पात देशाच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता आणि कोणत्याही प्रकारचे आर्थिक धोरण मांडण्यात आले नव्हते. १९५० - ५१ च्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमं