Posts

Showing posts from November, 2016

फार छान आणि आशयगर्भ असतात हो नवीन सिनेमातील गाणी पण- निलेश पाटील

Image
मंडळी आपण म्हणतो की सध्याची म्हणजे नवीन गाणी खूपच विचित्र आणि कर्कश असतात विशेषतः हिंदी गाणी. कारण आपण बहुतेक सर्वजण( साधारणतः आता चाळीशीच्या आसपास असलेले तर नक्कीच) एकदम सुरेल जुनी हिंदी-मराठी गाणी ऐकतच मोठे झालोय. मलापण असेच वाटत होते अगदी अलीकडेपर्यंत पण काही निवडक नवीन गाणी आपण जेव्हा निवांतपणे लक्षपूर्वक ऐकतो आणि त्यातल्या त्यात जर अचानक त्या गाण्याच्या आशयाशी मिळता-जुळता काही प्रसंग घटना आपल्या लक्षात आली तर त्या गाण्यातील शब्द,स्वर आरोह-अवरोह याकडे आपले बारीक लक्ष जाते आणि बघता बघता आपण ते गाणे ऐकताना त्याच्याशी समरस होऊन जातो. मला असेच एक गाणे येथे नमूद करावयाचे आहे. ते आहे MP4 फॉरमॅट मध्ये इथे : एखाद्या वेळी तुम्हाला असे पण वाटेल की  काहीही लिहितो हा भाऊ पण असो . काल रात्री बऱ्याच उशिराने "हमारी अधुरी कहाणी" हे अरिजित सिंगच्या आवाजातील जीत गांगुलीने संगीतबद्ध केलेले शीर्षक गीत प्रथमच ऐकले , सिनेमात त्याचा संदर्भ काय आहे हे मला नाही माहित तो बघितला नसल्याने पण ते ऐकत असतांना त्याचा काल्पनिक संदर्भ "आमच्या मातोश्री(आई )गेल्यानंतर(जी तशी अकालीच वयाच्या

पडलेल्या पावसाचे होते काय? (बॉन निंबकर)

Image
पाऊस किती पडतो त्यावरून पीक किती येणार ते ठरते. मात्र पीक चांगले येण्यासाठी पाऊस कधी पडतो, किती जोरात पडतो आणि पडलेल्या पावसाचे नेमके काय होते हे पाहणेही महत्त्वाचे आहे. त्यावरच किती पीक येणार, येणार की नाही हे ठरते. याबद्दल नारायण कानिटकर यांनी केलेला अभ्यास काय सांगतो, ते पाहू- बॉन निंबकर  पाऊस पडल्यानंतर पाण्याचा निचरा प्रामुख्याने तीन प्रकारे होतो.  पाणी जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जाते,  मातीत मुरते किंवा  मातीत मुरण्यापूर्वीच त्याचे बाष्पीभवन होते.  पावसाचे पाणी  जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूप होते. जमिनीचा उतार मंद असेल, तर त्यावरील माती एकसमान निघून जाते व मातीतील दगड तसेच राहिलेले दिसतात. हे म्हणजे स्तर अपक्षरण ( Sheet Erosion ). स्तर अपक्षरणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते होताना साध्या डोळ्यांना दिसत नाही. मात्र त्यामुळे होणारी मातीची धूप प्रचंड असते. दुसरे म्हणजे घळी अपक्षरण ( Gully Erosion ). घळी अपरक्षण चिकण मातीत अधिक प्रमाणात दिसते. चिकण माती सुकून तयार झालेल्या भेगामध्ये पाणी साचून ३० सें.मी. पेक्षा खोल घळ तयार होते आणि

अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाइल-निखिल रत्नपारखी

Image
निखिल रत्नपारखी यांचा हळुवारपणे हास्यकारंजे फुलविणारा आणखी एक खुसखुसीत लेख ______________________________________________________________ अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत आणि अत्यावश्यक गरजा आहेत असं आपण शाळेत शिकलो. त्यानंतर आजूबाजूला दिवसेंदिवस वाढणाऱ्या धकाधकीच्या परिस्थितीमुळे टेन्शन्सही वाढली आणि असुरक्षितताही. त्यामुळे मन दुसरीकडे रमवण्यासाठी इतरेतर करमणूक ही एक महत्त्वाची गरज झाली. प्रत्येक वेळी जनसामान्यांना नाटक-सिनेमा ही परवडणारी करमणूक नव्हती. त्यामुळे मग साहजिकच सहजसाध्य, तंगडय़ा पसरून कितीही वेळ मन रमवता येईल असा टीव्ही- अर्थात असंख्य चॅनेल्सवरील करमणूक ही मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक होऊन बसली. माझ्या लहानपणीही टीव्ही होता. पण संध्याकाळी सहा ते रात्री दहा एवढी लिमिटेडच करमणूक त्यावेळी टीव्हीवर उपलब्ध होती. शिवाय तुमच्या घरी टीव्ही असणं हे अपार श्रीमंतीचं लक्षण समजलं जाई. त्यामुळे टीव्हीवरील करमणूक ही बऱ्याच कुटुंबांसाठी दुसऱ्यावर अवलंबून असे. तीही आतासारखी रंगीबेरंगी करमणूक नव्हती, तर ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट होती. तीसुद्धा टीव्हीचा अ‍ॅन्टेना योग्य प्रकारे बसवला अस

इडापीडा आणि टोळीराज्य-अतुल देऊळगावकर

Image
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात मराठवाडय़ातील शिवारेच्या शिवारे पाण्याखाली घालणारा पाऊस हा आक्रितच होता. ६८ पावसाळे पाहिलेल्या राजाभाऊ देशमुखांनी (पाटोदा, जि. बीड) असा पाऊस कधी अनुभवला नव्हता. धबधब्यासारख्या वाहणाऱ्या पाण्यानं पाझर तलाव फुटले. बलगाडीच्या चाकाएवढे दगड शेतात येऊन पडले. चार-पाच इंच माती वाहून गेल्याने खडक उघडे पडले. चार वर्षांनंतर सोयाबीनचे भरघोस पीक पाहून गंगापुरातील सुधाकर िशदे (वय ५४) प्रफुल्लित झाले होते. एका रात्रीच्या पावसात सारे रान पाण्यात बुडताना पाहून ते कासावीस झाले. त्यांच्या डोळ्यादेखत शेतातली माती ओढय़ा-नाल्यात जाऊन बसली होती. चार वर्षे विनापाण्यात पिके करपली अन् यंदा पाण्याने वाहून नेली. ‘पिके काय जातात; पण वाहून गेलेली माती कशी आणायची?’ या प्रश्नाने शेतकरी हतबल झाले. मराठवाडय़ात ‘पावसाची नऊ नक्षत्रे गायब झाली आणि दोन नव्याने आली. निर्जळी आणि ढगफुटी!’ अशी नवी म्हण तयार झाली आहे. भारतातले हवामानतज्ज्ञ आणि संशोधन संस्था म्हणतात, ‘पाऊसमान बदलत असल्याचे पुरावे दिसत नाहीत. पावसाची मागील १५० वर्षांची आकडेवारी पाहिली तर अधूनमधून अतिवृष्टी व अवर्षण येतच असतात. या घटन