Posts

Showing posts from March, 2016

कोण कोणाला मारित भोंगा? श्री.ज्ञानेश्वर मुळे

श्री . ज्ञानेश्वर मुळे(Consul General of India, New York, USA ) यांचा एक विचार करायला लावणारा लेख: _______________________________________________________________________________ कोण कोणाला मारित भोंगा? सातेक वर्षांच्या परदेशातील वास्तव्यानंतर परतल्यानंतर तीव्रतेने जाणवलेली एक गोष्ट कोणती, असे कुणी विचारले तर मी म्हणेन "आवाज.‘ चोहोबाजूंनी येणारा . प्रत्येक दिशेने येणाऱ्या या सगळ्या आवाजांचा एक सामूहिक जीवघेणा आवाज जणु पाठलाग करतोय. वाटते की आपल्यापुढे एकच पर्याय आहे. या सर्व आवाजांना चिरत जाणारा आपला एक आवाज उठवावा किंवा उंच आकाशात उडवावा आणि सांगावे, "बंद करो सब आवाजें हमेशा के लिए‘  दिल्लीतील आवाजांची विविधता आणि तीव्रता लक्षणीय आहे. इथली कबुतरे आणि कावळेसुद्धा जोरजोरात शक्तिप्रदर्शन करताना दिसतात. वाहनचालक सहज "हमरीतुमरी‘वर येतात, तेव्हा "हमरीतुमरी‘चा अर्थ कळतो. बुद्धिवंतांच्या आवाजाची वेगळीच गोष्ट. वृत्तपत्रांतील सर्व बातम्यांचा एकसंध गदारोळ उडून आपली भंबेरी उडतेय की काय, असा भास होतो. त्या सर्व लेखांना आणि बातम्यांना, मुद्रित-लिखित शब्दांऐवजी आवाज प्र

नावात काय नाही?- निखिल रत्नपारखी

Image
शेक्सपीअर म्हणून गेला आहे की , ‘ नावात काय आहे ’? मला काही हे सहजासहजी मान्य होणारं नाही. मान्य होणार नाही म्हणजे आपण काही थोरामोठय़ांविषयी सवंग किंवा उगाच वादग्रस्त विधानं करून लोकप्रियता मिळवणाऱ्यांपैकी नाही. पण मी म्हणतो- नावात काय नाही ? हेच मत माझ्या एका क्रांतिकारी मित्राचं पण आहे. (स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पुणे शहरात ‘ क्रांतिकारी ’ या शब्दाचा अर्थ कुठलीही भीडभाड न बाळगता आपलं मत स्पष्टपणे मांडणारा- एवढाच मर्यादित आहे. याला विषय , वय , हुद्दा याचं बंधन नाही. फक्त आपलं मत चारचौघांच्या कानावर जाईल आणि एखादी छोटीशी का होईना , आपली बातमी कुठेतरी छापून येईल याची खबरदारी घेतली म्हणजे क्रांतिकारी असण्यामागचा आपला हेतू सफल झाला असं म्हणायला हरकत नाही.) तर नावांच्या बाबतीत माझ्या मित्राचं म्हणणं इतकं विचित्र आहे! हा मित्र म्हणतो , ‘ नावात काही नसेल तर मी माझ्या मुलांना नंबराने संबोधलं तर चालेल का ? ए १७२ , डुकरासारखा लोळत काय पडलायस ? ३४० तू जर १७२ च्या नादी लागलास तर तूही त्याच्यासारखा आळशी होशील. तो शेजारचा ४२० बघ कसा गुणी मुलगा आहे! तो आणि त्याचा भाऊ ५६० परीक्षेत कसे मार्कस् मिळवतात

बोली भाषांच्या संवर्धनासाठी...इरगोंडा पाटील

Image
भाषेचा जन्म बोलण्यासाठी झालेला असल्याने त्याचे मूळ स्वरूप हे बोली असेच असते. त्यामुळे सर्वच भाषा या प्रथम बोली आहेत. भाषा ही भाषाच असते, ती शुद्ध अगर अशुद्ध असत नाही. तरीही भाषेच्या प्रमाणीकरणाची गरज शिक्षण आणि व्यवहारासाठी आवश्‍यक असते. जगभर ज्ञानाचा व्यवहार करणारा एक अभिजात वर्ग आहे. हा संख्येने कमी असला, तरी सत्ताधारी असतो. त्यामुळे ज्ञानाचा व्यवहार करणाऱ्या अभिजनांची बोली हीच त्यांनी प्रमाण भाषा बनवली. त्याच भाषेची जी विविध रूपे असतात, त्यांना ज्ञानाच्या व्यवहाराची भाषा म्हणून स्थान मिळाले नाही. या सर्व बहुजनांच्या बोली आहेत.  मराठीतील प्रमाण भाषा ही अभिजनांची बोली आहे. तीच आज शिष्ट भाषा म्हणून शिक्षणाची भाषा म्हणून मान्य आहे. मराठीच्या विविध बोली या मराठीची विविध रूपे आहेत. बहुजन दैनंदिन व्यवहार याच बोलीतून करतो. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे जगभरच्या बोली भाषा मृत्यूपंथाला लागतील, असे भाषावैज्ञानिक सांगत आहेत. या बोलीभाषांच्या संवर्धनासाठी ‘युनेस्को’ने योजना तयार केली आहे. केंद्र सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत. या मलमपट्ट्या आहेत. प्रत्येक भाषेच्या अस्तित्वासाठी