Posts

Showing posts from April, 2015

... अन् भुर्र उडून जा!

आज मला विजय पाडळकर यांची एका पोक्त बापाची लघुकथा आठवते आहे. या बापाला एक दिवस, मुलगा सातव्या वर्गात असताना त्याच्यासाठी घेतलेली टेबल टेनिसची रॅकेट आणि चेंडू सापडतात. ते दिसल्यावर त्याला तो तेव्हा मुलाबरोबर खेळत असलेला, चेंडू खाली न पाडता त्याचे टप्पे बॅटवर मारत राहण्याचा खेळही आठवतो. (त्यावेळेस या खेळात तोच नेहमी जिंकत असे) आज हे आठवल्यावर तो बाप पुन्हा एकदा तसं खेळायचा प्रयत्न करतो. पण दहा-बारा टप्प्यांच्या वर त्याला ते जमत नाही. कथेच्या शेवटी पाडळकर लिहितात, ''आजकाल तो रोज प्रॅक्टिस करतो आहे. एका महिन्यात चाळीस टप्प्यांपर्यंत मजल गेली आहे त्याची. त्याला खात्री आहे, अटलांटातला मुलगा जेव्हा पुढच्या दिवाळीला भेटायला येईल तेव्हा आपण नक्कीच त्याला हरवू शकू.'' परदेशात स्थायिक झालेल्या तरुण मुलांच्या आईबापांच्या आयुष्यातल्या पोकळीचं हृदय हेलावणारं दर्शन या छोट्याशा कथेमधून आपल्याला होतं आणि आपण चुकचुकतो. असे आयुष्य जगणारी अनेक वयस्कर जोडपी आज आपल्याला अवतीभवती दिसतात. आर्थिक समृद्धी आहे. पण मायेचं जवळ कुणीच नाही. त्यामुळे भयाण एकाकीपणा आहे, असहायता आहे आणि शिवाय मुलं, सुना,

चाळिशी मायक्रोसॉफ्टची !

Image
‘विंडो’ उघडल्याशिवाय कॉम्प्युटरच्या दुनियेची सकाळ होत नाही. एवढी सर्वव्यापी बनलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीला नुकतीच (४ एप्रिल) चार दशकं पूर्ण झाली. संपूर्ण जगाला नवी दिशा देणाऱ्या या कंपनीचा प्रवास थक्क करणारा आहे, तसंच खूप काही शिकवणाराही. संगणकांच्या सॉफ्टवेअर क्षेत्रात ही कंपनी अद्याप ‘दादा’ आहे; पण हीच स्थिती कायम राहणार का? मायक्रोसॉफ्टच्या कामगिरीचा मागोवा... ‘अवर इंडस्ट्री डज नॉट रिस्पेक्‍ट ट्रॅडिशन- इट ओन्ली रिस्पेक्‍ट्‌स इनोव्हेशन.’ मायक्रोसॉफ्टचा सीईओ म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सत्या नडेला यांच्या पहिल्या भाषणातलं हे विधान खूपच गाजलं. ‘परंपरा विसरा, नव्याचा शोध घ्या’ असा अर्थ कुणी काढला, तर काहींनी त्याकडं आणखी वेगळ्या नजरतून पाहिलं.  आपणास ‘एमएस डॉस’ माहिती आहे का? बरं, विंडोज वन माहितेय का? बरं जाऊ द्या, विंडोज ९५, ९८. पण विंडोज एक्‍सपी निश्‍चितच माहिती असणार, कारण ते अलीकडेच ‘आउटडेटेड’ झालं आहे. या प्रश्‍नांची उत्तरं शोधताना सत्या नडेला यांच्या विधानामध्ये किती तथ्य आहे, हेच अधोरेखित होईल. कारण दिवसभर संगणकविश्‍वात रमणाऱ्या आजच्या पिढीला ‘एमएस डॉस’ माहितीच नाही, त्य

'मनीऑर्डर' इतिहासाच्या पलीकडे..

Image
भारतीय पोस्ट सेवेचा इ.स.१६८८ मध्ये ब्रिटीशांनी मुंबई येथे एक कार्यालय    स्थापन  केल्यापासून आजपर्यंत एक स्वतंत्र असा शेकडो वर्षांचा इतिहास आहे. कालानुरूप पावले टाकत  ब्रिटीशांनी आपल्या साम्राज्य विस्तारासोबत पोस्ट आणि रेल्वे सेवांचे जाळे भारतभर विणले.बघता बघता या सेवा जीवनावश्यक म्हणाव्या इतक्या सर्व सामान्य नागरिकांच्या आयुष्यात रुळल्या पैकी अगदी गावोगाव खेडी-पाडी पोहोचलेली पोस्टसेवेइतकी खचितच कुठली इतर शासकीय-बिगर शासकीय यंत्रणा  नागरिकांच्या दैनंदिन  आयुष्यात  महत्वाची ठरली असेल. इतक्या प्रदीर्घ सेवेनंतर पुन्हा एकदा बदलत्या गतिमान तंत्रज्ञानासोबत जुळवून घेतांना जुन्या सेवांना कधी आपोआप बाद ठरल्यामुळे तर कधी अगदीच थंडावलेल्या प्रतिसादामुळे कायमच्या बंद करण्याची सुरुवात कधीच झाली. पोस्टकार्ड, तारसेवा आणि मनी ऑर्डर यासारख्या अनेक सेवांपैकी एक अत्यंत महत्वाची असलेली;  ग्रामीण भागातील चाकरमानी कुटुंबांच्या अर्थकारणाशी जोडलेली आणि निरोपाबरोबरच पैसे देण्यासाठी धावणारी 'मनीऑर्डर सेवा' नुकतीच १ एप्रिलपासून बंद करण्यात आली आहे.  एप्रिलच्या पहिल्या तारखेला कानावर पडणाऱ्या बातमीवर वि

कालाय तस्मे नमः

आपण सर्वांनीच कधी ना कधी गारुडी आणि त्याचे नाग-साप आणि मुंगुसाचे खेळ किंवा डोंबारी-मदारी यांचे खेळ पाहिलेले असतील. विशेषत: ग्रामीण भागात ज्यांचे बालपण गेलेले आहे त्यांनी तर हमखासच आठवडी बाजार किंवा गाव-जत्रेत हे गारुड नक्कीच अनुभवले असेल. ज्या काळात करमणूकीची साधने मर्यादित होती, टी . व्ही . संगणक मोबाईल फोन वगैरे काही नव्हते तेव्हा   गारूड्याचे खेळ बघायला तुफान गर्दी जमत असे आणि ती गर्दी पाहून गारुड्याला  जास्तच चेव चढून त्या खेळामध्ये छान रंगत येत असे. नेहमीप्रमाणे खेळ सुरु करण्यापूर्वी गर्दी गोळा करण्यासाठी ढोल किंवा टिपीकल फिल्मी स्टाईलमध्ये बीन वगैरे वाजवून आणि  आपला एखादा सवंगडी आम जनतेमध्ये पूर्व नियोजितपणे पेरून /सोडून लोकांचे लक्ष आकर्षित करण्याची कला त्या गारुड्याला  अवगत असे. पण कालाय तस्मे नमः म्हटल्याप्रमाणे आता हल्ली या करमणूक प्रकाराकडे जनता साफ दुर्लक्ष करत असल्यामुळे किंवा एकुणातच आताच्या वेगवान जीवन शैलीमुळे म्हणा किंवा करमणुकीसाठी अधिक चांगले पर्याय उपलब्ध असल्यामुळे म्हणा हवे तर; गारुडी, डोंबारी-मदारी ह्यांच्यावर नक्कीच उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांच्यासाठी आपल्

"स्वाद भरे शक्ती भरे पारले-जी"

Image
समस्त भारत खंडात पारले बिस्किटे आणि त्याच्या वेष्टनावरील सुरेखश्या बाळाचा फोटो  कोण ओळखत नाही गेली काही दशके पिढ्यानपिढ्या ह्याच एका बिस्किटावर फिदा असल्याचा जमाना आताशा काळानुरूप मागे पडत चालला तरी ती बिस्किटे आणि त्यांच्या सह असलेल्या प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी कश्या विसरता येतील? एका प्रसिद्ध वर्तमान पत्राच्या संकेत स्थळावर आपल्या लाडक्या पार्ले बिस्किटाविषयी खालील माहिती   मिळाली : पार्ले-जी चवीसाठी तर प्रसिद्ध आहेच (किंवा होता म्हणूया हवे तर सध्या ),पण त्याबरोबरच  त्याच्या वेष्टनावरील बाळाचा चेहरा/फोटोही तितकाच प्रसिद्ध आहे. पण ते बाळ म्हणजे जाहिरात संस्थेने निर्माण केलेले एक काल्पनिक सर्जन (क्रिएटिव)चित्र होते यावर आपला कितपत विश्वास बसेल बर ? जग १९२९ मध्ये भारतात पारले बिस्किट निर्मिती सुरु झाली असा कंपनीच्या संकेतस्थळावर उल्लेख सापडतो. १९८० मध्ये पारले-जी बिस्किटे Gluco असे नामकरण करण्यात आले. हे जी म्हणजे ग्लुकोज आहे असा याचा अर्थ.१९८२मध्ये पहिल्या टीव्ही व्यावसायिक जाहिरातीत "स्वाद भरे शक्ती भरे पारले-जी" असे घोषवाक्य (slogan ) वापरण्यात आले. पारले-जी

स्पाय कॅम अर्थात छुपा कॅमेरा हो !!

Image
असं म्हणतात की, गरजेतून शोध जन्माला येतो. मानवनिर्मित पसाऱ्याची सुरक्षितता जपण्यासाठी नेमलेल्या मानवी चक्षूंच्या मर्यादा अनेक घटनांतून स्पष्ट झाल्या म्हणूनच स्पाय कॅमेऱ्यांचा शोध लागला. त्याशिवाय आपल्यामागे आपल्याबद्दल कोण कोण काय बोलतं? हे जाणून घेण्याची उत्सुकताही होतीच.. कुणालाही न दिसता समोर घडणाऱ्या प्रत्येक हालचाली सजगपणे टिपणारा कॅमेरा म्हणून सीसीटीव्ही गुप्तचर विभाग, पोलीस यंत्रणा यांच्या बराच उपयोगी पडू लागला. एखाद्या परिसरामध्ये कमीत कमी मनुष्यबळ वापरून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक देशांत हे कॅमेरे ठिकठिकाणी बसविण्यातही आले आहेत. पूर्वीच्या काळी फक्त फोटोग्राफरच्या हातात असणारं कॅमेरा नावाचं यंत्र आज मोबाइल टेक्नॉलॉजीमुळे तुमच्या- आमच्यासारख्या सामान्यांच्या हातात येऊन विसावलं आहे. त्या काळी आयुष्यातील सुंदर व न विसरता येणारे क्षण दृश्य स्वरूपात बंदिस्त करणारा कॅमेरा आज बंदिस्त जगातील आपल्या नजरेआड होणाऱ्या बाबी आपल्यासमोर आणणारा साधन बनला आहे, जपानमध्ये आलेला पूर असो, २६/११ चा हल्ला असो अगर जे डेंसारख्या पत्रकाराची निर्घृण हत्या असो, साऱ्या घडलेल्या घटनांना प्रत्यक्