Posts

Showing posts from March, 2017

‘‘कलानंद ही काही चूष नव्हे’’-मुकुंद संगोराम

Image
किशोरीताईंचा जन्म झाला, तेव्हा भारतीय चित्रपट बोलायला लागून दोनच वर्षे झाली होती. ते बोलपट गीतांनी भरलेले असायचे. पहिल्याच ‘आलम आरा’ या बोलपटात गाणी खचाखच भरलेली होती. जी होती, तीही अभिजात संगीतातील बंदिशींवर आधारित. ‘अयोध्येचा राजा’ या पहिल्या मराठी बोलपटातही गोिवदराव टेंबे यांच्यासारख्या कसलेल्या कलावंताच्या संगीत दिग्दर्शनाखाली भरपूर गाण्यांचा समावेश करण्यात आला होता. तेव्हा भारतातील कानाकोपरा अभिजात संगीतात न्हाऊन निघत असे. कारण संगीत हे असे साधन होते, की प्रत्येकाला त्याने भुरळ पाडली होती. किशोरीताईंच्या मातोश्री मोगुबाई कुर्डीकर या, त्या काळातील एक तपस्वी आणि तालेवार कलावंत. त्या अल्लादिया खाँसाहेबांच्या तालमीत तयार झालेल्या एक कसदार आणि पेचदार गायिका होत्या. त्या काळात अल्लादिया खाँ यांच्यासारख्या प्रतिभावंताने एका नव्या गायनशैलीला जन्म दिला होता आणि ती रसिकांच्या पसंतीला पुरेपूर उतरत होती. कोल्हापूरसारख्या कलानगरीत खाँसाहेबांनी आपली कला अशा एका अत्युच्च कोटीला पोहोचवली होती, की त्या काळातील अन्य घराण्यांच्या कलावंतांनाही त्याने मोहवून टाकले होते. प्रत्येक कलावंत आपापली स

एकमेवाद्वितीय ‘गेट वे ऑफ इंडिया’-उज्ज्वला आगासकर

Image
मुंबई बेटाच्या पूर्व किनाऱ्यावर सम्राट अशोकाच्या काळापासून बंदर होते व त्याचे नाव त्या काळात ‘पल्लव’ असे होते. मुंबईच्या अनेक आकर्षणांपैकी एक म्हणजे ‘गेट वे ऑफ इंडिया. त्याच्या कायमस्वरूपी, पक्क्या बांधकामाची पायाभरणी  झाली ती ३१ मार्च १९१३ रोजीनिमित्त.. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील मध्यवर्ती स्थान आणि येथून तत्कालीन ज्ञात जगाशी सहज साधता येणारा संपर्क या प्रमुख कारणांमुळे मुंबईच्या सात बेटांच्या समूहाचे पूर्वीपासून राज्यकर्त्यांना आकर्षण होते. इ.स. ११४० पासून राणा प्रताप बिंबाची हिंदू राजवट, नंतर १३४८ पासून मोगल प्रभाव व १५३४ पासून पोर्तुगीज राज्य मुंबईने पाहिले. मात्र नंतर पोर्तुगीजांनी राजघराण्यातील सोयरिकीमुळे मुंबई बेट ब्रिटिशांना १६६१ मध्ये आंदण दिले व ते १६६५ मध्ये प्रत्यक्ष हस्तांतरित झाले. अशा पद्धतीने मुंबईच्या भूगोलावर व कारभारावर ब्रिटिशांचा चंचुप्रवेश झाला व त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा उठवत १९४० मध्ये भारतावरील सत्ता सोडावी लागेपर्यंत मुंबईचे भौगोलिक व आर्थिक स्वरूप पूर्णपणे बदलून टाकले. येथे एक मुद्दा विचारात घेतला पाहिजे की हे सर्व करताना ब्रिटिशांचे

पॉण्डिचेरी बस नाम ही काफी है!

Image
बंगलोरमध्ये असताना माणूस पॉंडिचेरीला गेला नाही म्हणजे घाटावर राहणाऱ्या आणि फिरायची आवड असणाऱ्या माणसाने कोकणात न जाण्यासारखं आहे. इथून पूर्वेकडचा जवळचा आणि सुंदर समुद्रकिनारा असणारं शहर म्हणजे पॉंडिचेरी. इतकं साधं सोपं गणित आहे हे.  इथून निघून एखाद्या वीकेंडला संपूर्ण पॉंडिचेरी बघता येतं. शुक्रवारी रात्री निघालं कि शनिवारी पहाटे पहाटे माणूस पॉंडिचेरीमध्ये येतो. आपलं नशीब चांगलं असेल तर पहाटे पर्यंत आपण तिथे पोहोचतो. बसने जात असू तर बसस्टॅन्डपाशीच एखादी रिक्षा करायची (मीटरने मिळायची शक्‍यता कमीच)आणि सरळ बीच रोड गाठायचा. रोडच्या 20-25 मीटर अलिकडे रिक्षा थांबते कारण संध्याकाळी पाच ते सकाळी नऊ हा रस्ता गाड्यांसाठी बंद असतो. रिक्षातून उतरत असताना आकाश उजळत असतं. थोडंसं चाललो की एकदम मऊ मऊ वाळूत पोहोचतो आपण. आपल्या स्वभावाला साजेल अशी जागा शोधायची आणि सूर्योदय बघायचा. मधेच एखादा ढग सूर्याशी लपाछपी खेळत असतो. आयुष्यात बऱ्याचदा समुद्रावरचा सूर्यास्त बघणाऱ्या पश्‍चिम किनाऱ्याकडच्या आपल्यासाठी हा फार सुखद अनुभव असतो. जर आपण सप्टेंबर ते फेब्रुवारीच्या आसपास गेलो तर साडे सात-आठ वाजेपर्यंत क

आपल्याला क्रिकेट का आवडतं? (अभिजीत पवार)

Image
भारतीय उपखंडात बाकी सगळ्या क्रीडाप्रकारांपेक्षा सर्वाधिक लोकप्रियता लाभली आहे ती क्रिकेटला. असं का आहे याच्या कारणांची उजळणी- सध्या शहरी तरुण वर्गात अधूनमधून एका मुद्दय़ावर चर्चा सुरू असते. तो मुद्दा म्हणजे ‘माध्यमांनी, लोकांनी क्रिकेट सोडून इतर खेळांना महत्त्व द्यावे!’ यासाठी बहुतेक वेळा त्या खेळाबद्दल काहीही न बोलता, क्रिकेटने इतर खेळांची कशी दुर्गती केली आहे, क्रिकेटनेच कसा पैसा खेचलाय, इतर खेळांना कसे दुर्लक्षित केले जाते असा सूर लावून धरला जातो. अशी चर्चा म्हणजे १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला देशप्रेम दाखवणं, ऑलिम्पिक जवळ आलं की इतर खेळ कसे वर आले पाहिजेत यावरचे विचार मांडणं अशीच असते. या लोकांनी इतर खेळ खेळले असण्याची शक्यता जवळ जवळ शून्य असते. खरं सांगायचं तर इतर खेळांचं मला वावडं नाहीये. सर्व खेळांनी आपापल्या क्षमतेने प्रगती करत राहावी; पण त्यासाठी इतर खेळांच्या समर्थकांनी क्रिकेटचा भारतीय उपखंडातील प्रवास जाणून घेणे गरजेचे आहे. उपखंडात क्रिकेटच का? याचं सोपं उत्तर आहे, आपले सगळ्यांचे राज्यकर्ते क्रिकेट खेळायचे म्हणून. राज्यकर्ते जे करतात, त्याकडे लोक आकर्षित होणे स्वाभाविक असत