Posts

Showing posts from June, 2014

फर्मानबाडीचे महत्त्व-सदानंद मोरे

Image
पानिपतचा पराभव मराठय़ांच्या इतिहासातील सर्वात क्लेशकारक घटना मानायचे असेल, तर सर्वात सुखद  घटना म्हणून पेशव्यांना वस्त्रे देण्याचा, म्हणजे 'फर्मानबाडी'च्या कार्यक्रमाचा उल्लेख करता येईल. बादशाहची मुखत्यारी मिळाल्यामुळे मराठे दिल्लीच्या मोगल सत्तेचे अधिकृत प्रतिनिधी बनले. इंग्रजांनाही अडवण्याचा व चाप लावण्याच्या अधिकार त्यांना प्राप्त झाला. या प्रक्रियेत अनेकांचा सहभाग असला तरी शेवटास नेली ती महादजी शिंदे यांनी.. पानिपतच्या युद्धात मराठय़ांचे जे नुकसान झाले, त्याचा विचार करता एखाद्यास तो मराठय़ांच्या इतिहासाचा 'अँटिक्लायमॅक्स' वाटणे शक्य आहे. पण मग 'क्लायमॅक्स' कोणत्या घटनेला मानायचा, असा प्रश्न उपस्थित होईल. येथे कोणालाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची आठवण होईल. शेकडो वर्षांच्या पराभवाच्या व पारतंत्र्याच्या परंपरेला छेद देणारी व खुद्द औरंगजेबाला 'हाय तोबा' करायला लावणारी ही घटना मराठय़ांच्या इतिहासास कलाटणी देणारीही होती. तथापि, त्या वेळी मराठय़ांच्या पराक्रमाची व सत्तेची तयारी महाराष्ट्रापुरती मर्यादित होती. पानिपतची लढाई दूर महाराष्ट

पानिपतची लाभहानी-सदानंद मोरे

Image
पानिपतच्या पराभवाचा मोठा बाऊ करणे चुकीचे आहे.  ज्यांच्या हातून पराभव झाला तो सेनानी कुशल आणि सैन्य पराक्रमी होते. हे विसरता कामा नये, की ब्रिटिशांनी हिंदुस्थान जिंकून घेतल्यानंतर अफगाणांशी केलेल्या तीन युद्धांमध्ये त्यांना निर्णायक विजय मिळवता आला नाही. अलीकडच्या काळात रशियन सैन्यालाही अखेर अफगाणिस्तानातून माघार घ्यावी लागली आणि त्यानंतर अजूनही अमेरिकेने अफगाणांचा पूर्ण बंदोबस्त केला आहे असा दावा व्हाइट हाऊस करू शकत नाही.. खैबरखिंडीतून भारतावर आक्रमण करून आलेल्या आक्रमकाशी संघर्ष करून, त्याला या संघर्षांत हरवून, त्याचा पाठलाग करीत त्याच्या मायदेशी पिटाळून लावले आहे, असे मराठय़ांनी अब्दालीच्या फौजांना अटकेपार हाकलून देईपर्यंत कधी घडले नव्हते. मराठय़ांच्या काही तुकडय़ा सिंधुपार होऊन पेशावपर्यंत पोहोचल्याचा पुरावा कागदोपत्री आढळतो. पण मराठय़ांचे मनसुबे एवढय़ापुरतेच मर्यादित नव्हते. त्यांच्या डोळ्यांसमोरील हिंदुस्थानात काबूल, कंदाहारचे सुभे होते आणि त्याचा स्पषट उल्लेख त्यांनी केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अखंड हिंदुस्थानची व्याप्ती सिंधू नदीपर्यंत होती आणि मराठे काबूल, कंदाहारवरी