Posts

Showing posts from August, 2014

नेमेचि येतो पावसाळा

पावसाळा म्हटलं तर काहींचा अत्यंत आवडता  तर काहींचा नावडता ऋतू! मान्सून(नैरुत्य मारुत )थोड्या फार फरकाने कधी लवकर तर कधी उशिराने का होईना  एकदम इमान-एतबारे समस्त भारतभूमीतच नाही तर भारतीय उपखंडात बरसतच असतो.  साधारण एप्रिल -मे महिन्यात महाराष्ट्रातील (भारतातील पण म्हटले तरी चालेल)महानगर/नगर पालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे  अधिकारी आणि सजग नागरिक /विरोधी पक्ष यांचे नाले,मलनिस्सारण यंत्रणा साफ-सफाई(?) ,रस्ते दुरुस्ती(??)वरुन दावे-प्रतिदावे ,आरोप -प्रत्यारोप सुरु होतात. हे सर्व इतके सरावाचे झालेले आहे कि वर्तमानपत्र छापणाऱ्या किंवा बातम्या देणाऱ्या वाहिनीवरील मंडळीनी  बहुधा फक्त तत्कालीन कर्मचाऱ्यांचे नाव आणि तारीख बदलून कुठल्याही वर्षीच्या मजकूरात टाकली कि एकदम ताजी बातमी(ब्रेकिंग न्यूज ) तयार!! म्हणजे आता फक्त पाऊसाने बोहनी करण्याचीच बाकी राहिलेली असते. मग कधी तरी मुख्य परीक्षेआधी सराव चाचणी घ्यावी असा एखादा अवकाळी पाऊस कोसळतो (जो अलीकडील ४-५ वर्षात अगदी नियमितपणे येतोच ) आणि  बहुतेक सर्वांचे पितळ उघडे पाळतो म्हणा किंवा काही मंडळीना रोजी-रोटीची तरतूद झाल्याने, आपले म्हणणे खरे असल

बैलांची माती.. मातीचे बैल..आसाराम लोमटे

Image
ज्याच्या मानेवर वर्षभर शेतीधंद्यातल्या राबणुकीचा भार असतो त्यालाही एक दिवस विश्रांती मिळते. मानेवर जो निबर असा घट्टा पडलेला असतो तो हळद आणि तूप लावून चोळला जातो, खांदेमळण म्हणतात ती हीच. हे खांदे मळल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वच्छ आंघोळी घातल्या जातात. नदीच्या, ओढय़ाच्या खळाळत्या पाण्यात धुतले जाते. िशगे रंगविली जातात, बािशगे बांधली जातात, चमकदार ऐने लावलेल्या झुली चढविल्या जातात आणि वाजतगाजत मिरवणूकही काढली जाते. एकदा हा दिवस संपला की पुन्हा मानेवर जू आणि अधूनमधून चाबकाचे फटके. हे फक्त बलांच्याच बाबतीत घडते असे नाही, हा संबंध थेट निवडणुकांच्या राजकारणाशीही जोडला जाऊ शकतो. मतदानाच्या आदल्या दिवशी काय पाहिजे ते मागा, मतदान केंद्रापर्यंत नेण्या-आणण्याचीही व्यवस्था होईल. तुमच्या खाण्यापिण्याचीही काळजी घेतली जाईल, पण एकदा निवडणूक झाली की पुन्हा पुढची पाच वष्रे कुणी ढुंकूनही पाहणार नाही. पोळा प्रत्येकाच्याच नशिबी असतो फक्त त्याचे स्वरूप वेगळे. बैल-पोळ्याच्या दिवशी मात्र बैलांबद्दल खरोखरच आदरभाव व्यक्त होतो. बैलाचे लग्नही लावले जाते आणि त्याला पुरणपोळीही खाऊ घातली जाते. इतकी काळजी