Posts

Showing posts from August, 2013

यंत्रयुगाची आधारभूत वस्तू- चक्र

चक्र किवा चाकं हा माणसानं लावलेला अत्यंत महत्त्वाचा तसाच मूलगामी यांत्तिक शोध म्हणता येईल. एखादी अवजड वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेताना माणसांची शक्ती अपुरी पडत असेल तर गोलाकार वस्तूंवर ती चढवून ढकलत पुढं नेता येऊ शकते, हा आज साधा, सरळ आणि सोपा उपाय सुचायला मानवानं काही शतकं घेतली असणार, यात काय शंका? पण एकदा का ही यांत्तिक क्लृप्ती माणसाच्या ध्यानी आली, चाकाशिवाय एखादंसुद्धा यंत्र सापडणं कठीण, अशीच अवस्था झाली. युरोपात घडून आलेल्या औद्योगिक क्रांतीनंतर तर लहान-मोठ्या घड्याळाच्या काट्यापासून ते मोटरकार तसंच जेट इंजिन आणि संगणकाच्या 'डिस्क ड्राइव्ह' पर्यंत चाकाचाच वापर होत राहिला आहे. केंद्रबिदूभोवती म्हणजे अक्षाभोवती किवा आसाभोवती फिरणारं चाक हेच तत्त्व वापरलं जात आहे. इसवी सन पूर्व सुमारे ३५०० वर्षांपूर्वी मेसापोटेमियात (म्हणजे आताच्या इराकमध्ये) मातीची भांडी बनवणाऱ्या कंुभाराच्या चाकाचं अस्तित्व पुरातत्व संशोधकांना सापडलं आहे. या मेसापेटोमियातच इ.स. पूर्व ३२०० च्या सुमारास चाकाच्या साह्यानं चालणारे 'रथ' होते, असंही आढळून आलं आहे. अवजड सामान एका ठिकाणाहून दुसऱ

जगातील सात विषारी आश्चर्ये

‘रशियातील चेर्नोबिल अणुभट्टी परिसराला भेट’, ‘ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅचचा फेरफटका’, ‘उजाड अ‍ॅमेझॉन जंगलातली सहल’, ‘चीनमधील ई-भंगारदर्शन’, ‘भारतातल्या (गटार) गंगा-यमुना नद्यांची परिक्रमा’, ‘कॅनडातल्या सँड ऑइल खाणींचं पर्यटन’, ‘टेक्सासमधल्या रिफायनरी व्हिला येथे फेरफटका’ अशा जाहिराती छापून आल्या तर कुणी सामान बांधून उत्साहानं प्रवासाला निघेल? पण  न्यूयॉर्कचा अँड्रय़ू ब्लॅकवेल हा तरुण पत्रकार व चित्रपट निर्माता अशा साहसी-पर्यटनाच्या मोहिमांसाठी नेहमीच तयार असतो. या विलक्षण व आगळ्यावेगळ्या अनुभवांवर त्यानं अलीकडेच एक पुस्तक लिहिलं आहे. मानवनिर्मित विषारी पदार्थाच्या विळख्यातल्या सात प्रदेशांत फिरून आल्याचा अनुभव त्याच्या या पुस्तकात वाचायला मिळतो. भारत, कॅनडा, चीन, रशिया व अमेरिका येथील ही ठिकाणं असून, एक चेर्नोबिलचा प्रतिबंधित परिसर व पॅसिफिक सागराचा पाण्यातला भाग सोडला तर इतर पाच ठिकाणी दाट मानवी वस्ती आहे. २६ एप्रिल २०१२ रोजी रशियातल्या युक्रेनपासच्या चेर्नोबिल अणुभट्टीच्या दुर्घटनेला २६ वर्षे पूर्ण झाली. आता तिथं जिवावर उदार होऊन पर्यटन करू पाहणाऱ्या मंडळींसाठी पूर्ण तयारीनिशी एक दिवस

बालपणीचे खेळ मजेचे-- सुरेंद्र शेट्ये

आताच्या काळी चित्रविचित्र वाटतील असे कितीतरी खेळ लहानपणी आम्ही मुले खेळायचो. आताच्या मुलांना त्या खेळांतला ‘ओ की ठो’ सुद्धा कळणार नाही. आमच्या पिढीबरोबरच ते जुने खेळही इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत. ते तसे होण्यापूर्वी कागदोपत्री त्यांचा उल्लेख राहावा असे मनोमन वाटते. त्यासाठीच आजचा हा लेखनप्रपंच. आजच्या सारखी क्रिकेटची महागडी कीटस् आणण्याएवढे पैसे असायचे कोणाजवळ? तेव्हा आपले आमचे ते खेळ म्हणजे ‘बिन पैशाचा तमाशा’ सारखे! मुले एकत्र जमायचा अवकाश की, नेट - बॅट - बॉल - टेबलाशिवाय खेळता येण्यासारखे खेळ मैदानावर आणि घरातही सुरू व्हायचे. क्रिकेट खेळायचे झाले तरी त्याच्यासाठी बॅट - बॉलची गरज असायचीच असेही नाही. माडाच्या चुडताचा दांडा तासून केलेली ‘पिड्या’ ची बॅट आणि कुळागारातल्या ‘बेड्यां’चे बॉल मिळाले तरी विश्वचषकाच्या चुरशीने क्रिकेटचा खेळ रंगत असे. या सामन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात ‘मॅच फिक्सिंग’ नसायचे. जिंकण्याच्या अहमहमिकेनेच खेळ रंगत असे. निर्णयाप्रत पोहोचत असे! आट्यापाट्या, हुतूतूबरोबरच खोखो ही दोन प्रकारचे असत. उभा खोखो आणि बैठा खोखो. पाठशिवणीचा खेळ असायचा. एकाने डाव अ

मेघायन-आचार्य वसंत गोडबोले

Image
मेघांचे विश्व विविध आहे. त्यातही वैचित्र्य आहे. तसे हे मेघविश्व बाराही महिने अंबरात असतेच, पण पावसाळ्यातील मेघविश्व सर्वाधिक महत्त्वाचे असते. ‘ये रे घना ये रे घना’ किंवा ‘घन घन माला नभी दाटल्या’ यांसारखी भावगीते अंबरीतल्या मेघांनी मनाचा मयूर कसा भाववर्तन करतो ते दर्शवितात. मानवीच नव्हे, तर सर्व चरांना हे मेघविश्व आकर्षित करते. चराचरांवर जीवन वृष्टी करून जीवन फुलविणारे, जीवनातून जीवन अंबरी त्या रूपाने धारण करणारे जीवनधारी मेघ समस्त मानवी जीवनाचे आधार आहेत. कवींच्या कल्पनाविलासाला मेघविश्व उधाण देत आले आहे. तसे हे मेघविश्व बाराही महिने अंबरात असतेच, पण पावसाळ्यातील मेघविश्व सर्वाधिक महत्त्वाचे असते यात तीळमात्र संशय नाही. हे मेघविश्व वैविध्यपूर्ण, अनाकलनीय, अवर्णनीय, अथांग, अमर, अतक्र्य आवाक्यात न येणारे, अनादी, अनंत आहे. मनाचा ठाव घेणारे, मनावर आघात करणारे, मन प्रफुल्ल करणारे, अर्निबध, संचारी, अंबरीचे मेघविश्वाची सहल या अक्षरयानाने करण्याचा हा प्रयत्न आहे. पाण्याचा संचय असणारे हे मेघ विविध नावांनी संबोधिले जातात. त्यांचा प्रकारही जसा ठरविता येत नाही, तसा आकारही ठरविता येत नाही. या मेघव

चटका

सोमवार हा आठवड्यातील पहिला दिवस जरा जास्त घाईगडबडीचा असतोच . तसा  तो २९ जुलै २०१३ला पण होताच. या गडबडीत दुपारी बायकोचा फोन आला तो आमच्या सोसायटीत ट्रान्सफार्मर किंवा तत्सम कशाचा तरी प्रचंड मोठ्या आवाजानिशी  स्फोट झाला हे सांगण्यासाठी .  थोडा वेळ कोणालाच कसे काही कळाले नाही आणि त्या प्रसंगी तिथे उपस्थित असलेले सर्वजण कसे हादरले /घाबरून सैरावैरा वाट मिळेल तसे कसे पळत सुटले वगैरे .पण त्या नंतर जे काही वर्णन तिने सांगितले ते ऐकून क्षणभर अंगावर काटा आला आणि नेमके काय झाले असावे याविषयी तर्क-वितर्कांचे चक्र डोक्यात सुरु झाले. तिने कोणाला तरी पाठमोरे;पेटलेल्या अवस्थेत  आणि जीवाच्या आकांताने ओरडत पळतांना बघितले . त्या वेळी तिचे अवसान गळाले आणि जो मानसिक धक्का तिला बसला तो फोनवर बोलतांना पण स्पष्टपणे जाणवत होता पण नेमके काय  झाले असावे या विषयी काहीही माहिती तेव्हा मिळू शकली नाही .  विचार करता करताच ऑफीसची वेळ संपली  आणि घराकडे निघालो . सोसायटीत पोहचेपर्यंत मी पण नेमके काय झाले असावे याविषयी भीतीयुक्त उत्कंठा बाळगून होतो . तिथे पोहोचल्यावर कळल कि सोसायटीच्या मैला शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्पाम

क्रिकेट : एक जीवनशिक्षण-डॉ. राजीव शारंगपाणी

आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटनांसाठी जणू क्रिकेट आपल्याला तयार करते. क्रिकेटमुळे समजते की यश-अपयश हे दोन्ही किती क्षणभंगुर असते. गेल्या सामन्यातील शंभर धावा आजच्या सामन्यात कामाला येऊ शकत नाहीत. किंवा आजच्या शून्य धावा म्हणजे आयुष्याचा शेवट नव्हे. निराशा किंवा आशा या दोन्ही गोष्टी सारख्याच बिनमहत्त्वाच्या आहेत, हे नीट समजते. बाद नसताना बाद दिले जाणे यासारखा दुसरा अन्याय नाही, पण अजिबात भावनाविवश न  होता शांतपणे निघून जाणे या गोष्टीला अत्यंत संयम लागतो. ड्रेसिंग रूममध्ये आल्यावर आदळ आपट अनेक जण करतात, पण ते साहजिक आहे असे सर्वच कबूल करतील. केलेल्या शतकानंतर अभिनंदनाचा वर्षांव होत असताना हेच हार घालणारे हात उद्या अंडी-टॉमॅटो देखील मारतील, हे प्रत्येक फलंदाजाला पुरेपूर माहिती असते. त्यामुळे वाहवत जाता येत नाही आणि जे वाहवत जातात ते क्रिकेटमध्ये टिकू शकत नाहीत. ‘सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ’ हे क्रिकेटइतके चांगले कुठे समजेल बरे? खुद्द डॉन ब्रॅडमन आपल्या त्रिशतकांविषयी  जेव्हा म्हणतात. ‘मी त्रिशक काढले हे जरी खरे असले तरी मी ते काढेपर्यंत माझ्यासमोर कुणीनाकुणी खेळत होते म्हणून मी ते काढ