Posts

Showing posts from January, 2015

माधव जूलियन-"प्रेमस्वरूप आई "

मराठीतील प्रसिद्ध कवी डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांची २१ जानेवारी ही जयंती. अत्यंत नावाजलेले मराठी कवी  आणि फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक या भूमिका त्यांनी अत्यंत ताकदीने पेलल्या. मराठी साहित्याचे भावविश्व आपल्या तरल आणि  भाव मधुर कवितांनी समृध्द केले. त्यांचीच "प्रेमस्वरूप आई" या शीर्षकाची एक अत्यंत हृदयस्पर्शी कविता : प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधू आई ! बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ? तू माय, लेकरु मी; तू गाय, वासरु मी; ताटातुटी जहाली, आता कसे करु मी ? गेली दुरी यशोदा टाकुनि येथ कान्हा, अन्‌ राहीला कधीचा तान्हा तिचा भुका ना? तान्ह्यास दूर ठेवी - पान्हा तरीहि वाहे - जाया सती शिरे जी आगीत, शांत राहे ; नैश्ठूर्य त्या सतीचे तू दावीलेस माते , अक्षय्य हृत्प्रभूचे सामीश्य साधन्याते. नाही जगात झाली आबाळ या जिवाची, तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची. चिती तुझी स्मरे ना काहीच रूपरेखा, आई हवी महणूनी सोडी न जीव हेका. विद्याधनप्रतिष्ठा  लाभे अता मला ही, आईविणे परी मी हा पोरकाच राही. सारे मिळेपरं तू आई पुन्हा न भेटे , तेणे चिताच चित्ती माझ्या अखंड पेटे . आई तुझया वियोग

संशोधन-अप्पा बळवंत

काळ : इ. स. पूर्व २७०० उष:काल होण्यास अद्याप तीन प्रहर अवकाश होता. संपूर्ण आश्रम निद्राधीन होता. रात्रकीटकही जणू श्रमून शांत झाले होते. गंगेपलीकडील अरण्यातून मधूनच येणारे श्वापदांचे उत्क्रोशवगळता सर्वत्र नीरव शांतता होती. श्रृतकेतू मात्र पूर्णत: जागा होता. सहस्ररश्मीच्या तीव्र तापाने स्थालिकेतील जलबिंदूंची वाफ व्हावी तसे त्याच्या नेत्रातील निद्रेचे झाले होते. अचानक देहावरील आस्तरण दूर सारून तो शय्यामंचावर उठून बसला. त्याच्या मन:च क्षूंसमोर काही तरी अस्पष्ट अस्पष्ट दिसू लागले होते. ते कुणाकडे तरी व्यक्त करावे असे त्यास प्रकर्षांने वाटत होते. पण सर्व सहाध्यायी निद्राधीन होते. कोणासमोर मनातील विचार व्यक्त करणार? अखेर त्याने बाजूच्या दीपिकेची ज्योत मोठी केली व त्या प्रकाशात भूर्जपत्रावर तो मनातील काव्य मांडू लागला.. ००० श्रृतकेतूच्या मनी गेल्या काही दिनांपासून एकच प्रश्नयज्ञ सुरू होता.. त्याच्या मनोभूमीत त्या प्रश्नाचे बीज पेरले होते, ते ऋषी स्तीवजाब यांनी. एके दिवशी सायंकालचे समयी स्तीवजाब व त्यांचे विद्यार्थीगण अरण्यातून परतत होते. अचानक त्यांना वाटेमध्ये एक ग्रामीण अस्ताव्यस्त पडलेला आ

गाणं! -अप्पा बळवंत

एक नवं क्यालेंडर                                                                                     अन् त्याची बारा पानं                                                                               एवढं काय असतं त्यात                                                                             की त्याचं गावं गाणं? तेच दिवस त्याच रात्री                                                                             तेच दहा ते पाच!                                                                                त्याच त्या प्रश्नांचा                                                                                   तोच तो नाच! हॅप्पी नवं साल म्हणून का त्याचं होतं सोनं? एवढं काय असतं त्यात की त्याचं गावं गाणं? शुभेच्छांच्या वर्षांवानं भिजला मोबाइल त्यानं का आयुष्याचं फेसबुक हिरवं होईल? कशासाठी लुटता मग ती एसेमेसची वाणं? एवढं काय असतं त्यात की त्याचं गावं गाणं? बाहेर बघा धुकं किती केवढी पडलीय थंडी! कुठून येईल ऊब इथं आपली फाटकी बंडी अच्छे दिन कसले लेको? ..पोकळ आश्वासनं! एवढं काय असतं त्