Posts

वाचू आनंदे.. नवे नवे!

  वाचू आनंदे.. नवे नवे!  वाचन संस्कृती लयास चालली आहे अशी सार्वत्रिक बोंब आसमंतात असताना; आणि साठ-सत्तरच्या दशकांतली पुस्तकंच आजही वाचली जात असल्याचं म्हटलं जात असताना ‘लोकसत्ता’ने अलीकडच्या काळातील नव्या लेखकांची पुस्तकं वाचणारे नेमकं काय वाचतात, याचा वेध घ्यायचं ठरवलं. त्यासाठी साहित्यिक, प्रकाशक, नाटक- सिनेमातील कलाकार, शासन-प्रशासनकर्ते, अर्थविश्व अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांना त्यांनी गेल्या वर्षभरात वाचलेल्या पाच नव्या पुस्तकांची नावे कळवावयास सांगितली. त्यानुसार आजच्या नव्या दमाच्या लेखकांचं कोणतं साहित्य वाचलं जातं याचं सम्यक चित्र वाचकांसमोर उभं राहील. काहींना अजूनही जुन्यांचा ओढा आहेच. परंतु एकुणात नवं साहित्य, नवे लेखकही जोमाने लिहीत आहेत. त्यांचाही वाचकवर्ग आहे. नव्याचं भान आणि जाण त्यातून प्रगट होते.  *प्राक्-सिनेमा : अरुण खोपकर * जवळीकीची सरोवरे : प्रज्ञावंत सखेसांगाती : नितीन वैद्य * काळ्या निळ्या रेषा : राजू बाविस्कर * चित्रसंहिता : मंगेश नारायणराव काळे * वारसा : मीना प्रभू *  रामदास भटकळ * अमर फोटो स्टुडिओ : मनस्विनी लता रवींद्र * रानवस्ती : अनिल दामले * पु. शि. रे

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

गेले ते दिवस आणि राहिल्या फक्त आणि फक्त आठवणी . आई , ५ वर्षं झालीही तुला जाऊन,आणि आम्ही तरी कुठे थांबलोय? संसारचक्र सुरूच आहे आणि धावतोय आम्हीही जमेल तसं पण आई आता तू नाहीस, फक्त तुझा आश्वासक आवाज आहे अजूनही कानात घट्ट रुतलेला,आणि खूप साऱ्या आठवणी ज्या उलगडत असतात एकामागून एक कधी अचानक तर कधी प्रसंगानुरूप. हे आई! आमचं विनम्र अभिवादन स्वीकार जिथे कुठे असशील तिथे  !!

मुंबईला खऱ्या अर्थाने श्रीमंत करणाऱ्या नाना शंकरशेठ यांची कहाणी

Image
मुंबईने ज्यांना श्रीमंत केले असे लक्षावधी लोक आपल्याला भेटतील, पण आपल्या कर्तृत्त्वाने आणि दातृत्वाने ज्यांनी मुंबईला श्रीमंत केले असे अगदीच मोजके. नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ हे त्यातील अग्रगण्य नाव. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करत, नानांनी या मुंबईत चोख व्यापार केला. उदंड पैसे कमाविले आणि कमाविलेल्या या पैशाचे फक्त उंच इमले न बांधता त्यातून समाज घडविणाऱ्या संस्था उभ्या केल्या. नानांनी उभारलेल्या संस्था पाहिल्या की आजही आवाक् व्हायला होते. आज नानांच्या पुण्यतिथीनिमित्त, त्यांच्या या खऱ्याखुऱ्या श्रीमंतेचे मॉडेल समजून घेण्याचा केलेला हा प्रयत्न. नानांचा काळ (१८०३-१८६५) हा इंग्रजाविरुद्ध सुरू झालेल्या स्वातंत्र्ययुद्धाच्या आधीचा काळ. मुंबई हे शहर म्हणून आकाराला येण्याचा हा कालावधी. समुद्री व्यापारामळे हे शहर घडत होते आणि रोजगाराची संधी शोधण्यासाठी लोक या शहरात येत होते. नानांचे कुटुंब या अशा मुंबईत येणाऱ्या लोकामधील अगदी सुरुवातीला आलेल्यामधले लोक म्हणायला हवे. नानांचे पूर्वज बाबूलशेठ मुरकुटे अठराव्या शतकात कोकणातून मुंबईत आले. मुंबईच्या आघाडीच्या व्यापाऱ्यांमध्ये त्यांची गणन

आई-चतुर्थ पुण्यस्मरण

आई तू आमच्यातून खूप खूप दूर अनंताच्या प्रवासाला निघून जाऊन चार वर्षे झाली पण.दिवस कसे भराभर निघून जातात मनाच्या कप्प्यात आठवणींचा दरवळ मागे ठेऊन ते कळतही नाही. पण एकमात्र खरं प्रसंगानुरूप येतच असते ग तुझी आठवण आणि आतातर जास्तच कारण मधला काही काळ मन तयार नव्हतं म्हणा की सुन्न झाले होते म्हणा; पण तू आता आमच्यासोबत नाही हा विचार मनात पण न फिरकू देण्याचे अविवेकी म्हण,नाही तर अजून काही -प्रयत्न अज्ञानपणे आम्ही करून बघितले, समजावत राहिलो मनाला की, तू आहेस कोणाच्या तरी घरी आणि आता काही वेळाने फोन करून सांगशील की, भाऊ आम्ही येतोय तुझ्या घरी, खूप दिवस झाले नातवंडांना भेटून तेव्हा त्यांची- तुमची उभ्या उभ्या भेट घेऊन परत जाऊ;पण कसचं काय? उगीचच आपले मनोविभ्रम,आणि काय? पण आताशा कळलं आणि थोडं थोडं उमगतही चाललं की, जे आपण दूर लोटू इच्छितो तेच अंतिम आणि कदाचित एकमेव शाश्वत सत्य आहे या भूलोकावरचे.पण ते एकदा कळल्यावर आता हेही लक्षात येतेय की आई गमावणे म्हणजे नेमकं काय असतं! हुंदका दाटून येतो मनात पण सांगणार कुणाला? आणि हो,आता जरा मोठं झाल्याचं ओझं नाही;पण जबाबदारी म्हणूया हवं तर असं हळवं होऊन व्यक्त व्

कदम मिलाकर चलना होगा-We will miss you Atalji

Image
कदम मिलाकर चलना होगा बाधाएँ आती हैं आएँ घिरें प्रलय की घोर घटाएँ पावों के नीचे अंगारे सिर पर बरसें यदि ज्वालाएँ निज हाथों में हँसते-हँसते आग लगाकर जलना होगा कदम मिलाकर चलना होगा हास्य-रुदन में, तूफानों में अगर असंख्यक बलिदानों में उद्यानों में, वीरानों में अपमानों में, सम्मानों में उन्नत मस्तक, उभरा सीना पीड़ाओं में पलना होगा कदम मिलाकर चलना होगा उजियारे में, अंधकार में कल कहार में, बीच धार में घोर घृणा में, पूत प्यार में क्षणिक जीत में, दीर्घ हार में जीवन के शत-शत आकर्षक अरमानों को ढलना होगा कदम मिलाकर चलना होगा सम्मुख फैला अगर ध्येय पथ प्रगति चिरंतन कैसा इति अब सुस्मित हर्षित कैसा श्रम श्लथ असफल, सफल समान मनोरथ सब कुछ देकर कुछ न माँगते पावस बनकर ढ़लना होगा। कदम मिलाकर चलना होगा। कुछ काँटों से सज्जित जीवन, प्रखर प्यार से वंचित यौवन, नीरवता से मुखरित मधुबन, परहित अर्पित अपना तन-मन, जीवन को शत-शत आहुति में, जलना होगा, गलना होगा। कदम मिलाकर चलना होगा। ८ दिसंबर २००१ _____________________________________________________________________________________ We will miss you Atalj

चवीची उत्क्रांती-रवींद्र मिराशी

'उत्क्रांती' या शब्दाचा जर कुठेही उल्लेख केला असेल, तर मागील कित्येक वर्षांचा थोडक्यात तरी मागोवा घेणे क्रमप्राप्तच असते. उत्क्रांती म्हणजे काय? तर क्रमाक्रमाने होणारा विकास. आता आपण मनुष्याचा विचार करू या. चारशे पन्नास कोटी वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीचा जन्म झाला, तेव्हा मनुष्यप्राणी पृथ्वीवर अस्तित्वात नव्हता. मग त्याचे अस्तित्व नेमके कधी निर्माण झाले आणि त्याच्या जीवनात 'चव' नेमकी कधी आली, हे पाहणे कुतूहलपूर्ण आहे. मात्र, असंख्य गोष्टींपैकी 'चव' या एका गोष्टीचा विचार करण्यापूर्वी मनुष्याच्या अस्तित्वाचा मागोवा घेणे गरजेचे आहे. जीवजंतूपासून अनाकलनीय अशा अवस्थांमधून प्रवास करीत टप्प्याटप्प्याने मनुष्यप्राणी उत्क्रांत झाला. अमिबापासून सुरू झालेल्या या प्रदीर्घ प्रवासात आपल्या पूर्वजांना आत्मा अमर असतो इथपर्यंतचे ज्ञान नेमके कधी झाले, हे कुणालाच सांगता येणार नाही. पृथ्वीच्या जन्मापासून पहिली ४४९ कोटी वर्षे मनुष्यप्राण्याच्या एकूण अस्तित्वाच्या दृष्टीने विचार करता खूपच संथ होती. उत्क्रांतीचा संबंध माणसाच्या केवळ शारीरिक विकासाशी नाही. यात असंख्य गोष्टींच्या विकास