Posts

Showing posts from December, 2016

कविवर्य कै. मंगेश पाडगावकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली !!

Image
Image Credit: http://maharashtratimes.indiatimes.com/photo/50386256.cms

पाटील, खलनायक नव्हे नायकच !(प्रकाश पाटील)

Image
कसं, काय पाटील बरं हाय का ? काल काय म्हणाला ते खरं हाय का ? हे अजरामर गाणं ते आज गाजत असलेले "" बाई, वाड्यावर चला,'' हे गाणं असो. पाटील हा नेहमीच करमणुकीचा आणि चेष्टेचा विषय बनला. त्याची ही एकच बाजू पुढे आली. दुसरी बाजू कधीच पुढे आली नाही. त्याला नेहमीच खलनायकाच्या पिंजऱ्यात उभे केले. मात्र तो खलनायक नव्हे तर नायक आहे ही प्रतिमा कधीच पुढे आली नाही. पाटलांवरील पाचंट विनोद करण्यातच आनंद लुटला जातो. कसं काय पाटील हे गाण तर त्याच्या कपाळावर चिकटवले गेले ते कदापी पुसणार नाही. या गाण्यानेच नव्हे तर मराठी चित्रपटांत पाटलाला नेहमीच रंगेल, कटकारस्थानी, धूर्त, रांगडा, वैगेरे वैगेरे जे काही वाईट तो म्हणजे पाटील. नुकताच एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो तेथेही पाटलांचे नाव घेतल्याशिवाय पान पुढे सरकलेच नाही. व्हॉटसअप असू द्या, व्यंगचित्र, किंवा नाटक-सिनेमा पाटील हा सर्वांचाच आवडता विषय. होय, पाटील अगदी चित्रपटात उभा करतात तसाच रांगडा, घरंदाज, करारी, गावचं नेतृत्व करणार पुढारी, अकडबाज मिशा, टोपी-धोतर, पायात कर्रकर्र वाजणाऱ्या चामड्याच्या चपला असे त्याचे व्

आंबेडकरी विचारांचा परीघ विस्तारणे सद्यस्थितीत गरजेचे- डॉ संजय देशमुख(विद्यमान कुलगुरू मुंबई विद्यापीठ)

Image
प्रज्ञासूर्य  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६०व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त यांना  शतश: अभिवादन ! सद्य स्थितीत संपूर्ण भारत वर्षात आरक्षण आणि अन्य सामाजिक असमतोल या मुद्द्यावरून संघर्ष पेटला असतांना  आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासारख्या अनेक महापुरुषांचे याविषयीचे प्रवर्तक विचार हेतुपुरस्सर म्हणा किंवा राजकीय हेतूने म्हणा अडगळीत टाकले आहेत. आज आपण या महापुरुषांना जाती धर्मात वाटून घेतले आहे जे पुरोगामी किंवा प्रगतीचे नव्हे तर अधोगतीचेच लक्षण म्हणावे लागेल. डॉ संजय देशमुख- विद्यमान कुलगुरू मुंबई विद्यापीठ यांचा "आंबेडकरी विचारांचा परीघ विस्तारणे सद्यस्थितीत गरजेचे"  या शीर्षकाचा एक चिंतनीय लेखकाल वाचनात आला तो खालीलप्रमाणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा सर्वोच्च कोटीचा प्रज्ञावंत, मानवी जीवनाशी व समाजजीवनाशी एकरूप झालेला सामाजिक विचारवंत आणि देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास ५० टक्के पददलित लोकांचा मुक्तिदाता जगाच्या पाठीवर दुसरा नसेल. भारतातील जातिव्यवस्थेचा, अन्यायी धर्मव्यवस्थेचा उत्तुंग उंचीचा विश्लेषक, संशोधक, मीमांसक म्हणून डॉ. आंबेडकर महान आहेतच;

आपलाही देश बेपत्ता? - डॉ. गिरीश पिंपळे

Image
३० वर्षांपूर्वी ज्यांची गणना मध्यम किंवा कनिष्ठ मध्यमवर्गात होत असे असा वर्ग आज उच्च मध्यम किंवा श्रीमंत वर्गात प्रविष्ट झाला आहे. ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु बदलत्या काळानुसार त्याची बदललेली जीवनशैली आणि मूल्ये मात्र विचारी मनांना चिंताग्रस्त करणारी आहे. या बदलत्या समाजघटकाच्या स्थिती-गतीचा परामर्श.. ‘आपण’ म्हणजे कोण? तर- सुमारे ३० वर्षांपूर्वी ज्यांची गणना मध्यमवर्गात किंवा कनिष्ठ मध्यमवर्गात होत असे असा भारतीय समाजाचा घटक! गेल्या ३० वर्षांत या वर्गाचं रूपांतर उच्च मध्यम किंवा श्रीमंत वर्गात झालं आणि त्याची जीवनशैली पार बदलून गेली. पूर्वी एखाद्या वाडय़ामध्ये दोन खोल्यांत भाडेकरू म्हणून कसंबसं आयुष्य घालवणारा हा मध्यमवर्गीय माणूस आता दोन बेडरूमच्या स्वत:च्या प्रशस्त फ्लॅटमध्ये राहायला गेला आहे. गेल्या ३० वर्षांत पती आणि पत्नी- दोघांनी नोकरी करण्याचं प्रमाण वाढलं. दोन सायकली किंवा एखादी मोपेड याऐवजी आता एक किंवा दोन चारचाकी वाहनं खरेदी करण्याइतका पैसा त्याच्या हातात खुळखुळू लागला. कुटुंबीयांच्या सोयीसाठी दोन-दोन टीव्ही संच घेणे त्याला सहज परवडू लागलं. घरातल्या प्रत्येकाकडं महागडा स्

वाटणीने केले शेतीचे वाटोळे ! - जयंत महाजन

Image
शेती हा दिवसेंदिवस अवघड होत चाललेला धंदा बनला आहे. वरवर पाहता दिसायला सोपा पण प्रत्यक्ष करायला उतरल्यावर अत्यंत कठीण असा हा व्यवसाय झाला आहे. कोरडवाहू-जिरड शेती म्हणजे निसर्गाच्या नावाने खेळायचा जुगारच झाला आहे. कधी दुष्काळाने तर कधी अतिवृष्टीने कोरडवाहू शेतीचे तीन तेरा होतात आणि सावकाराचा कर्जाचा डोंगर उभा रहातो. बागायती शेतीची तऱ्हा त्याहून वेगळी. लहरी निसर्गाने शेतीचे नुकसान केले. शेतीमालाला रास्त बाजारभाव मिळवून न देणाऱ्या राज्यकर्त्यांनी नुकसान केले. शेतकऱ्यापेक्षा उद्योजक-व्यापाऱ्यांचे हित पाहणाऱ्या सत्ताधीशांनी तर शेतकऱ्यांची धुळधाण उडवली. सहावा-सातवा वेतन आयोग घेऊन शेतीवर शहरामध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देणाऱ्या बड्या बाबूंनी शेतकऱ्यांना बुडविले .या बरोबरच विभक्त कुटुंबपद्धतीने आणि वाटणीने शेतीचे आणि शेतकऱ्याचे वाटोळे केले आहे असे मला वाटते. पाश्‍चिमात्य जीवनशैलीची ओढ लागलेल्या मराठी माणसाने संयुक्त कुटुंब पद्धतीने हळूहळू सोडून देऊन त्रिकोणी ( पती, पत्नी, मुले) अशी पद्धती स्वीकारली. भाकरीसाठी कुटुंब सुटले. भाकरीसाठी गाव सुटले. भाकरीसाठी विभक्त कुटुंबाची शहरात वणवण सुरू झाल

बावनकशी सौंदर्य परिमळ - मल्हार अरणकल्ले

Image
बावनकशी सौंदर्य परिमळ  चांगलं आणि वाईट अशी वर्गवारी आपण अगदी सहज करतो. मनात त्याचे काही ठरीव निकष नसतात. त्याला कुठली मोजपट्टीही नसते. असलेच तर काही अनुभव आणि त्यांवरून बांधलेले आडाखे इतकंच, अशा वर्गवारीसाठी आपल्याला पुरेसं वाटतं. या वरवरच्या तुलनेतून आपण अनेक गोष्टींविषयी मत ठरवीत असतो. त्याची सत्यसत्यता मात्र कधीच तपासत नाही.  जग अशा किती तरी विविधतांनी भरलेलं आहे. एकाच्या तुलनेत दुसरं उठून दिसतं, उजवं दिसतं. यांतलं एक नसतं, तर दुसऱ्याचं महत्त्व स्पष्ट झालंच नसतं. असलं वैविध्य नसतंच, तर जगातलं सारं सौंदर्य, सारी भव्यता काजळून गेली असती. तुलनेसाठी त्याच प्रकारचं दुसरं काहीच नसतं, तर चांगल्या-वाईटाचे स्तर निर्माण झालेच नसते. सगळंच एकसारखं, हुबेहूब असतं, तर झाडं सारखी, पानं-फुलं सारखी, झाडांचा विस्तार सारखा, उंचीही सारखी. हे दृश्‍य काही काळ सुंदर वाटेलही; पण ते एकसुरी असणार. दुःखाचे, पराजयाचे, सत्वपरीक्षेचे क्षण अनुभवल्यानंतर आलेल्या सुखाची झुळुक निश्‍चित सुखदच वाटणार.  जगात ज्याचं ज्याचं अस्तित्व आहे, त्या प्रत्येकाची विशिष्ट भूमिका आहे. रंगमंचावर पात्रं येतात, आपापले संवाद बो