Posts

लक्ष दीप उजळले! -मल्हार अरणकल्ले

Image
संध्याकाळ भरून आली आहे. क्षणाक्षणाला गडदपणा दाट होतो आहे. पणत्यांचे, आकाशदीपांचे तेजाकार त्यावर उमटत आहेत. अंगणांत, खिडक्‍यांत, सज्ज्यांत, उद्यानांत तेजोमय प्रकाशज्योतींचं साम्राज्य लखलखत आहे. रांगोळ्यांची चिन्हं या तेजाक्षरांचे अर्थ खुलवीत-फुलवीत आहेत. एका अपूर्व तेजानं दीपोत्सवाचा आनंद ओसंडून गेला आहे.  भरलेल्या आनंदाचा प्रत्येक कण म्हणजे त्याचं सूक्ष्मरूप असतो. इवल्या पणतीतल्या वातीच्या शीर्षावर नाचणाऱ्या ज्योतीतही ब्रह्मतेजाचं रूप सामावलेलं असतं. आपण सगळेच भव्यतेचं कौतुक करतो; पण ही भव्यता ज्या छोट्या छोट्या प्रयत्नांतून साकारलेली असते, त्या प्रयत्नांच्या वाट्याला कृतज्ञतेचा शब्द क्वचितच येतो.  पणतीचा आकार बोटं जुळवून होणाऱ्या खोलगट तळव्यासारखा असतो. या तळव्याची मध्यमा इतर बोटांपेक्षा काहीशी मोठी, सशक्त असते. ही मध्यमा तळव्यातल्या सकारात्मकतेचं ज्योतिरूप असते. पणतीतली ज्योतही कडेच्या एका बिंदूच्या आधारानं उंचावलेली असते. ज्योतीचा पाया टोकदार असतो आणि तिच्या शीर्षबिंदूवरही तेजाचंच टोक असतं. मध्यभागी ज्योत विस्तारलेली असते. अंधकाराचे अनेक आळोखेपिळोखे ती गिळून टाकते. प...

मराठीचे लक्ष बहुभाषांकडे हवे... - डॉ. केशव देशमुख

Image
गेल्या तीन दशकांतील मराठी म्हणून लिहिले गेलेले सर्जनशील साहित्य व त्यापूर्वीची समृद्ध साहित्य परंपरा केवळ श्रेष्ठच नाही, तर ती जागतिक म्हणून तसूभरही कमी नाही. फक्त अनुवादातून बहुभाषांकडे जाण्याचा प्रवास धीमा आहे. तेव्हा बहुभाषा अवगत करण्यासाठी सकारात्मक होण्याची गरज आहे.  मराठीला ज्ञानपीठ सन्मान कमी का मिळाले आणि उशिरा का मिळाले? अशी एक रास्त मीमांसा केली जाते. याचे उत्तर मराठीचे "मराठीपुरते‘ शहाणे असेही आहे. मराठीत विलक्षण क्षमता असूनही आणि महानुभाव, वारकरी संस्कृतीचे मराठीला भव्य अधिष्ठान असूनही अनुवादांसारख्या क्षेत्रातून ही मराठी जागतिक झाली नाही, हे एक कारण कटू असले तरी खरे आहे. दाखला द्यायचा झाला तरी बाबूराव बागूल, रा. चिं. ढेरे, अशोक केळकर किंवा नामदेव ढसाळ, यशवंतराव चव्हाण, गो. नी. दांडेकर किंवा विजय तेंडूलकर, वि. द. घाटे, व्यंकटेश माडगूळकर असे वीसचाही आकडा ओलांडून सांगता येतील एवढे श्रेष्ठ लेखक मराठीत आहेत. पण "ज्ञानपीठा‘पर्यंत पोचलेले नाहीत. इंग्रजीचे ज्ञान, अनुवादाचे काम आणि या आवश्‍यक बाबीमुळे मराठीची सशक्त साहित्यसंपदा असूनही, सर्वस्वी राष्ट्रीय ...

खड् खड् खड्डे-निखिल रत्नपारखी

Image
नुकताच वाहतुकीच्या नियमासंदर्भातला एक व्हिडिओ  व्हॉट्सअ‍ॅपवर बघायला मिळाला. सरकारने वाहतूक नियंत्रणामध्ये काही सुधारणा करायच्या ठरवल्या आहेत आणि त्यासाठी ठिकठिकाणी किंवा चौकाचौकात कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे जो कोणी वाहतुकीच्या नियमांचा भंग करू धजावेल त्याला पुराव्यानिशी कचाटय़ात पकडायचा. सरकारचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे, असे म्हणायला हरकत नाही. सहज गंमत म्हणून तुम्ही सिग्नल मोडायला जाल तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊन दंडाची पावती फोटोसकट तुमच्या घरी येईल. तो मी नव्हतोच, कधी, कुठे, तुमचा काही तरी गैरसमज होतोय वगैरे फालतू वितंडवाद किंवा पळवाटांना आता जागाच नाही. आता माझ्या मनात एवढीच शंका येत आहे. एखादा उत्साही गृहस्थ या फोटोंचा अल्बम करून घरी येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या करमणुकीसाठी त्या फोटोचे प्रदर्शन तर मांडणार नाही ना? हा फोटो मी अमूक एका चौकात गणपुल्यांच्या मर्तिकाला जात असताना सिग्नल तोडला तेव्हाचा. हे आम्ही ट्रिपलसीट डान्सबारमध्ये निघालो होतो तेव्हाचा. हा मी नो एन्ट्रीतून प्रेयसीला भेटायला जात असतानाचा. हा मी गाडी चालवत असताना, मोबाइलवर क्रिकेट स्कोअरची चर्चा ...

नातं भांड्यांशी - गाळणी, चाळणी, रोळी, खिसणी! - चित्कला कुलकर्णी

Image
माझी आई घरातल्या विविध भांडयांकडे अगदी कुटुंबातील सदस्यच असल्याप्रमाणे लक्ष देत असे आणि त्यावेळी फ्लॅट संस्कृतीचा अभाव असल्यामुळे  जेव्हा केव्हा शेजारी काही खाद्य-पदार्थ , धान्य दही वगैरे वस्तूंची खुलेपणाने देवाण-घेवाण होत असे त्यावेळी जर चुकून एखाद्या शेजारणीला दिलेले विशिष्ट भांडे परत आले की नाही याकडे तिचे अगदी काटेकोर लक्ष असायचे म्हणजे अगदी आपण कार्यालयात ऑडिट करतांना स्टॉक-कीपिंग तत्व वापरतो त्याचप्रमाणे. आता   हा उल्लेख   काही मंडळींना अतिशोयक्त वाटेलही कदाचित पण तत्कालीन स्त्री भावविश्वाचा विचार करून बघायचा प्रयत्न केल्यास त्यात खूपसे तथ्य आहे हे लक्षात आल्यावाचून राहत नाही . एवढे सर्व विचार इथे मांडायचे कारण म्हणजे या संदर्भातच दैनिक सकाळमध्ये  वाचनात आलेला  "नातं भांड्यांशी - गाळणी, चाळणी, रोळी, खिसणी! " हा चित्कला कुलकर्णी यांचा  अगदी समर्पक लेख जो खालील प्रमाणे:  प्रत्येक भांड्याचं दैनंदिन व्यवहारातलं महत्त्वाचं स्थान पाहिलं की, वाटतं ते भांडं काही ना काही सुचवतं. आपल्या अस्तित्वातू...

येरे येरे पावसा... मला मिळतो पैसा... चंद्रहास मिरासदार

सरकारी कार्यालयात सकाळी अकरा ते बारा या दरम्यान जसं वातावरण असतं, तसंच आजही होतं. तिकडं दिल्लीत मोदी साहेब सकाळी नऊ वाजताच कार्यालयात हजर असतात, अशा बातम्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत असल्या तरी जिल्ह्याच्या ठिकाणच्या या राज्य सरकारच्या कार्यालयात मात्र या बातमीचा अजून परिणाम झालेला नाही. परिणामी सवडीनं कार्यालयात येणं आणि सवड मिळली तरच काम करणं, या दैनंदिनीमध्ये काहीच फरक पडलेला नाही. या मंडळींसाठी बारा महिने चोवीस तास "अच्छे दिन'च असतात. असो. कार्यालयातल्या लेखनिक पदावर काम करणाऱ्या महिला वर्गाच्या "आज सकाळी कशी खूप गडबड झाली आणि त्यात भाजी करायला कसा वेळच मिळाला नाही,' अशा छापाच्या गप्पा इमानेइतबारे चालू आहेत. भाऊसाहेब, रावसाहेब मंडळींना यायला अजून वेळ आहे. भाऊसाहेब, रावसाहेबांच्या हाताखालची मंडळी टेबलावर दोन-चार फायलींचा पसारा मांडून त्याकडे पाहत बसली आहेत. आई-वडिलांनी बळजबरीनं अभ्यासाला बसवलेला मुलगा ज्याप्रमाणे डोळ्यांसमोर पुस्तक धरून बसलेला असतो, तसंच काहीसं फायली पुढ्यात घेऊन बसलेल्या मंडळींकडे पाहून वाटू शकतं. काही मंडळींच्या उपाहारगृहात फेऱ्या चालू आहेत. ...

एक विश्‍वसनीय सत्यकथा ! (हेरंब कुलकर्णी)

Image
के. एस. अय्यर. आपलं सगळं आयुष्य विद्यार्थ्यांसाठी वेचणारा एक निरलस प्राध्यापक. पगारातला पैसा गरजेपुरताच ठेवून बाकीची रक्कम विद्यार्थ्यांसाठीच त्यांनी खर्च केली. अय्यर सर मूळचे केरळचे; पण महाराष्ट्र हीच त्यांची कर्मभूमी. गेली ३५ वर्षं त्यांचं वास्तव्य होतं बारामतीत... एका लॉजमध्ये आठ बाय दहाच्या छोट्याशा खोलीत ! कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेनं ते १९६८ मध्ये शिक्षकी पेशात आले आणि गांधीजींच्या प्रभावातून त्यांनी ध्येयवाद अंगीकारला. अय्यर सरांचं निधन पाच महिन्यांपूर्वी झालं. त्यांच्या तपस्वी जीवनाचं हे ओझरतं दर्शन उद्याच्या (पाच सप्टेंबर) शिक्षक दिनानिमित्त... श्रीकृष्ण रेस्टॉरंट, बारामती रूम नंबर २०२ या रूममध्ये एक प्रवासी मुक्कामाला आला आणि त्यानं चेक आउट केलं ते थेट ३५ वर्षांनीच... *** शेवटची ओळ नाही ना समजली? नाहीच समजणार... कारण ती आहेच अगम्य त्या ओळीचा अर्थ असा आहे, की त्या हॉटेलात राहायला आलेला प्रवासी एकाच खोलीत ३५ वर्षं राहिला... आठ बाय १० च्या इवल्याशा खोलीत... आणि तो आयुष्यभर फिरत होता सायकलवर! का? परिस्थिती गरीब होती म्हणून का? मुळीच नाही. वरिष्ठ महाविद्यालयात...

हेरगिरीचा धांडोळा : कौटिल्याची गुप्तहेर व्यवस्था(आसावरी बापट)

Image
जेम्स बॉण्डच्या हेरकथा पडद्यावर पाहतांना हेरगिरीचे आधुनिक काळातील अंतरंग पटकथाकाराच्या कल्पनाशक्तीप्रमाणे आपण पाहत आलोच आहोत. आधुनिक युद्धशास्त्रातही तंत्र ज्ञानाचा मुबलक वापर करून विविध देश आपापल्या गुप्तहेर संघटना सक्षमपणे कश्या कार्यरत राहतील याकडे लक्ष पुरवत असतात आणि आता अलीकडेच कडव्या विचारसरणीच्या धर्मांध अतिरेकी संघटनांचे अमानवीय दुष्कृत्ये आणि काही नापाक राष्ट्रांचे फुटीरता वाद्यांना फूस देऊन वेगवेगळ्या देशांच्या भूमीत जे अशांतता पसरविण्याचे दुरुद्योग सुरु आहेत ते बघता सक्षम गुप्तहेर यंत्रणा असणे फायद्याचे असते म्हणण्यापेक्षा अत्यावश्यक असते असेच म्हणावे लागेल. याचा अनुभव आपल्याला येतोच आहे . या अनुषंगाने आधुनिक काळात विविध देशांच्या गुप्तहेर संघटनांनी वेळोवेळी आपला ठसा उमटवलेला दिसून येतोच पण आपल्या इतिहास-समृद्ध भारतवर्षामध्ये पण हेरगिरी शास्त्राचा अगदी पुराण काळापासून व्यासंगी तसेच परिपूर्णरित्या अभ्यास आणि समर्पक वापर केल्याचे विपुल पुरावे-दाखले-नोंदी आढळतात. सदर विषयावर आधारित एक अत्यंत अभ्यासपूर्ण हा लेख खालीलप्रमाणे : हेरगिरीचा धांडोळा : कौटिल्याची गुप्तहेर व्य...